rutuja.joshi@timesgroup.com
@RutujaJoshiMT
व्यावसायिक नाटक चांगलं चालायला हवं तर ते कॉमेडीच पाहिजे हा समज आता प्रेक्षकांनी खोटा पाडला आहे. वेगळ्या विषयांवरची गंभीर नाटकंही चांगलं बुकिंग घेऊ लागली आहेत.
ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये परवा 'कोड मंत्र' या नाटकाचा प्रयोग हाऊसफुल्ल होता. काही दिवसांपूर्वी 'वाडा चिरेबंदी' आणि 'मग्न तळ्याकाठी' या दोन नाटकांचे एकापाठोपाठ झालेले प्रयोगही प्रेक्षकांनी हाऊसफुल्ल केले. जितेंद्र जोशी आणि गिरीजा ओक या जोडीचं 'दोन स्पेशल' हे नाटक सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. नाटकाला बुकिंगही उत्तम होतंय. तर दुसरीकडे 'मास्तर ब्लास्टर', 'प्लेझन्ट सरप्राइज', 'सुस्साट' या कॉमेडी नाटकांचं फार बरं चाललेलं नाहीय. तद्दन विनोदी नाटकांपेक्षा काहीतरी सांगू पाहणाऱ्या नाटकांना प्रेक्षकांची पसंती मिळत असल्याचं दिसून येतंय.
नाटक विनोदी असेल, तर ते शंभर टक्के हाऊसफुल्ल होईल याची निर्मात्यांना खात्री असते. मात्र नाटकांचे दिवस पालटले आहेत असं म्हटलं जाऊ लागलंय. मध्यंतरीच्या काळात वेगळे विषय मांडू बघणारी नाटकं आली खरी. पण काही प्रयोगातच त्यांना गाशा गुंडाळावा लागला होता. पण, प्रेक्षकांची बदलती आवड आणि नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असल्याने वेगळ्या विषयांवरच्या नाटकांना सुगीचे दिवस आल्याचं निर्मात्यांचं म्हणणं आहे. कलाकारांनाही असे वेगळ्या विषयांवर नाटक करून पाहणं आव्हानात्मक वाटत असल्यानं तेही अशा नाटकांच्या शोधात असतात.
ज्येष्ठ दिग्दर्शक राजन ताम्हाणे हेही लवकरच एक नवं नाटक घेऊन येतायत. त्यांचं हे नाटक काहीसं गंभीर आणि वेगळ्या जॉनरचं असल्याचं समजतं. अभिनेता अक्षर कोठारी यात महत्वाच्या भूमिकेत दिसेल. 'कलाकार म्हणून कॉमेडीच्या पलीकडे जाऊन काहीतरी वेगळं करण्याची माझी इच्छा होती. मी अशा वेगळ्या नाटकाच्या शोधात होतो जिथे मला वेगळ्या इमोशन्स मांडता येतील. म्हणून मी हे नाटक निवडलं. हे नाटक आजच्या काळातलं असून, नात्यांवर भाष्य करणारं आहे' असं मत अक्षर व्यक्त करतो.
बदल सकारात्मक
फक्त कॉमेडी नाटक असेल तरच प्रेक्षकांची गर्दी होते हे विधान मला कधीच लॉजिकल वाटत नाही. तुम्ही काही चांगलं, दमदार देत असाल तर प्रेक्षक नक्कीच नाटक बघायला येतात. सध्या सुरू असणारी नाटकं आणि त्याला मिळणारा प्रेक्षकवर्ग ही खरंच सकारात्मक गोष्ट आहे. आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे, आता 'नाटकाचा ऑडियन्स' अशी कुठलीही मक्तेदारी राहिलेली नाही. या अनेक तरुण, मध्यमवयीन मंडळीही नाटक बघायला येतात. 'आम्ही पहिल्यांदाच नाटक बघितलं. आता पुढे आणखी नाटकं बघू' अशा अनेक प्रतिक्रिया आम्हाला मिळत असतात. त्यामुळे हा बदल नक्कीच सकारात्मक आहे.
- मुक्ता बर्वे, अभिनेत्री-निर्माती
वेगळ्या विषयावरची नाटकं
कोड मंत्र
दोन स्पेशल
वाडा चिरेबंदी
मग्न तळ्याकाठी
किमयागार
एक शून्य तीन
@RutujaJoshiMT
व्यावसायिक नाटक चांगलं चालायला हवं तर ते कॉमेडीच पाहिजे हा समज आता प्रेक्षकांनी खोटा पाडला आहे. वेगळ्या विषयांवरची गंभीर नाटकंही चांगलं बुकिंग घेऊ लागली आहेत.
ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये परवा 'कोड मंत्र' या नाटकाचा प्रयोग हाऊसफुल्ल होता. काही दिवसांपूर्वी 'वाडा चिरेबंदी' आणि 'मग्न तळ्याकाठी' या दोन नाटकांचे एकापाठोपाठ झालेले प्रयोगही प्रेक्षकांनी हाऊसफुल्ल केले. जितेंद्र जोशी आणि गिरीजा ओक या जोडीचं 'दोन स्पेशल' हे नाटक सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. नाटकाला बुकिंगही उत्तम होतंय. तर दुसरीकडे 'मास्तर ब्लास्टर', 'प्लेझन्ट सरप्राइज', 'सुस्साट' या कॉमेडी नाटकांचं फार बरं चाललेलं नाहीय. तद्दन विनोदी नाटकांपेक्षा काहीतरी सांगू पाहणाऱ्या नाटकांना प्रेक्षकांची पसंती मिळत असल्याचं दिसून येतंय.
नाटक विनोदी असेल, तर ते शंभर टक्के हाऊसफुल्ल होईल याची निर्मात्यांना खात्री असते. मात्र नाटकांचे दिवस पालटले आहेत असं म्हटलं जाऊ लागलंय. मध्यंतरीच्या काळात वेगळे विषय मांडू बघणारी नाटकं आली खरी. पण काही प्रयोगातच त्यांना गाशा गुंडाळावा लागला होता. पण, प्रेक्षकांची बदलती आवड आणि नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असल्याने वेगळ्या विषयांवरच्या नाटकांना सुगीचे दिवस आल्याचं निर्मात्यांचं म्हणणं आहे. कलाकारांनाही असे वेगळ्या विषयांवर नाटक करून पाहणं आव्हानात्मक वाटत असल्यानं तेही अशा नाटकांच्या शोधात असतात.
ज्येष्ठ दिग्दर्शक राजन ताम्हाणे हेही लवकरच एक नवं नाटक घेऊन येतायत. त्यांचं हे नाटक काहीसं गंभीर आणि वेगळ्या जॉनरचं असल्याचं समजतं. अभिनेता अक्षर कोठारी यात महत्वाच्या भूमिकेत दिसेल. 'कलाकार म्हणून कॉमेडीच्या पलीकडे जाऊन काहीतरी वेगळं करण्याची माझी इच्छा होती. मी अशा वेगळ्या नाटकाच्या शोधात होतो जिथे मला वेगळ्या इमोशन्स मांडता येतील. म्हणून मी हे नाटक निवडलं. हे नाटक आजच्या काळातलं असून, नात्यांवर भाष्य करणारं आहे' असं मत अक्षर व्यक्त करतो.
बदल सकारात्मक
फक्त कॉमेडी नाटक असेल तरच प्रेक्षकांची गर्दी होते हे विधान मला कधीच लॉजिकल वाटत नाही. तुम्ही काही चांगलं, दमदार देत असाल तर प्रेक्षक नक्कीच नाटक बघायला येतात. सध्या सुरू असणारी नाटकं आणि त्याला मिळणारा प्रेक्षकवर्ग ही खरंच सकारात्मक गोष्ट आहे. आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे, आता 'नाटकाचा ऑडियन्स' अशी कुठलीही मक्तेदारी राहिलेली नाही. या अनेक तरुण, मध्यमवयीन मंडळीही नाटक बघायला येतात. 'आम्ही पहिल्यांदाच नाटक बघितलं. आता पुढे आणखी नाटकं बघू' अशा अनेक प्रतिक्रिया आम्हाला मिळत असतात. त्यामुळे हा बदल नक्कीच सकारात्मक आहे.
- मुक्ता बर्वे, अभिनेत्री-निर्माती
वेगळ्या विषयावरची नाटकं
कोड मंत्र
दोन स्पेशल
वाडा चिरेबंदी
मग्न तळ्याकाठी
किमयागार
एक शून्य तीन