मुंबई टाइम्स टीम
विनय आपटे दिग्दर्शित ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक रंगमंचावर आलं आणि एकच हलकल्लोळ झाला. गांधीजींची हत्या करणाऱ्यावर नाटक येणं यामुळे सेन्सॉरपुढेही पेच निर्माण झाला. पण अनेक अडचणींना तोंड देत याचे प्रयोग झाले. अभिनेते शरद पोंक्षे यांनी साकारलेला नथुराम लोकांना आवडला. नंतर याचे प्रयोग थांबले. आता हे नाटक पुन्हा रंगमंचावर येते आहे. शरद पोंक्षे यांनीच हे नवं नाटक लिहिलं असून, नथुरामाच्या आयुष्याच्या आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न यातून होणार आहे.
या नाटकाचं नाव आहे ‘हे राम.. नथुराम’. २ ऑक्टोबरपासून या नाटकाचे प्रयोग होणार आहेत. या नाटकाबद्दल बोलताना शरद पोंक्षे म्हणाले, 'आपण इतिहास बदलू शकत नाही. त्यामुळे इतिहास तोच आहे. व्यक्तिरेखाही बदलता येत नाहीत. पण नाटकाची मांडणी बदलू शकतो. धाटणी बदलता येते. या नाटकातले संवादही बदलण्यात आले आहेत. या नाटकात कोर्टरूम ड्रामा असेल. नथुराम त्याची केस कशी लढला हे मी या नाटकात मांडलं आहे. माझ्या नाटकात काळ बोलतो. नेपथ्य रिअलिस्टिक आहे. इथे व्यवस्थित कोठडी असेल.'
या नाटकात जयंत घाटे, हेमंत डोणकर, विविक जोशी, समर्थ म्हात्रे यांच्याही भूमिका आहेत.
सावरकरांबद्दल काही
विशेष म्हणजे या नाटकात सावरकरांबद्दलही काही आशय असणार आहे. 'नथुरामच्या या नियोजनात सावरकर होते असा समज अनेकांचा आहे. पण ते खोटं आहे. त्यांना हे कळलं असतं तर त्यांनी आधी नथुरामला थांबवलं असतं. या नाटकातून कुणाचंही उदात्तीकरण मला करायचं नाही', असंही ते म्हणाले.
तीन पुस्तकांचा संदर्भ
‘५५ कोटींचे बळी’, ‘मे आय प्लिज युवर ऑनर’ आणि ‘गांधी हत्या आणि मी’ या तीन पुस्तकांचा संदर्भ या नाटकात आहे. त्यावर बेतलेले संवाद या नाटकात आहेत, अशी माहितीही पोंक्षे यांनी दिली.
विनय आपटे दिग्दर्शित ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक रंगमंचावर आलं आणि एकच हलकल्लोळ झाला. गांधीजींची हत्या करणाऱ्यावर नाटक येणं यामुळे सेन्सॉरपुढेही पेच निर्माण झाला. पण अनेक अडचणींना तोंड देत याचे प्रयोग झाले. अभिनेते शरद पोंक्षे यांनी साकारलेला नथुराम लोकांना आवडला. नंतर याचे प्रयोग थांबले. आता हे नाटक पुन्हा रंगमंचावर येते आहे. शरद पोंक्षे यांनीच हे नवं नाटक लिहिलं असून, नथुरामाच्या आयुष्याच्या आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न यातून होणार आहे.
या नाटकाचं नाव आहे ‘हे राम.. नथुराम’. २ ऑक्टोबरपासून या नाटकाचे प्रयोग होणार आहेत. या नाटकाबद्दल बोलताना शरद पोंक्षे म्हणाले, 'आपण इतिहास बदलू शकत नाही. त्यामुळे इतिहास तोच आहे. व्यक्तिरेखाही बदलता येत नाहीत. पण नाटकाची मांडणी बदलू शकतो. धाटणी बदलता येते. या नाटकातले संवादही बदलण्यात आले आहेत. या नाटकात कोर्टरूम ड्रामा असेल. नथुराम त्याची केस कशी लढला हे मी या नाटकात मांडलं आहे. माझ्या नाटकात काळ बोलतो. नेपथ्य रिअलिस्टिक आहे. इथे व्यवस्थित कोठडी असेल.'
या नाटकात जयंत घाटे, हेमंत डोणकर, विविक जोशी, समर्थ म्हात्रे यांच्याही भूमिका आहेत.
सावरकरांबद्दल काही
विशेष म्हणजे या नाटकात सावरकरांबद्दलही काही आशय असणार आहे. 'नथुरामच्या या नियोजनात सावरकर होते असा समज अनेकांचा आहे. पण ते खोटं आहे. त्यांना हे कळलं असतं तर त्यांनी आधी नथुरामला थांबवलं असतं. या नाटकातून कुणाचंही उदात्तीकरण मला करायचं नाही', असंही ते म्हणाले.
तीन पुस्तकांचा संदर्भ
‘५५ कोटींचे बळी’, ‘मे आय प्लिज युवर ऑनर’ आणि ‘गांधी हत्या आणि मी’ या तीन पुस्तकांचा संदर्भ या नाटकात आहे. त्यावर बेतलेले संवाद या नाटकात आहेत, अशी माहितीही पोंक्षे यांनी दिली.