अ‍ॅपशहर

अव्वल 'विभवांतर'

अस्तित्व आणि अखिल भारतीय नाट्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'कल्पना एक, आविष्कार अनेक' या आगळ्या-वेगळ्या एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच पार पाडली. या एकांकिका स्पर्धेचा विषय हा एका कल्पनेवर आधारित असतो.

Maharashtra Times 20 Oct 2016, 12:29 am
मुंबई टाइम्स टीम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम theatre compition
अव्वल 'विभवांतर'

अस्तित्व आणि अखिल भारतीय नाट्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'कल्पना एक, आविष्कार अनेक' या आगळ्या-वेगळ्या एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच पार पाडली. या एकांकिका स्पर्धेचा विषय हा एका कल्पनेवर आधारित असतो. यंदा प्रसिद्ध लेखिका मेघना पेठे यांनी सुचवलेली कल्पना म्हणजे 'जब जागो, तब सवेरा' ही होती. इंद्रधनू संस्थेची विभवांतर ही एकांकिका अव्वल ठरली. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत एकूण १६ एकांकिका सादर झाल्या त्यातील एकूण ५ एकांकिका अंतिम फेरी करता निवडण्यात आल्या. स्पर्धेच्या अंतिम फेरीत 'प्रारंभ' प्रवेश मुंबई, 'मयसभा' फिनिक्स मुंबई, 'आस्वल' अंतरंग थिएटर्स मुंबई, इंद्रधनू संस्थेची 'विभवांतर' आणि समर्थ अकादमी पुणे यांची 'सेकंडहँड' या एकाच कल्पनेवर पण वेगवेगळ्या विषयावर भाष्य करणाऱ्या एकांकिका सादर झाल्या. स्पर्धा ही अत्यंत अटीतटीची होती आणि तसंच वेगळ्या आणि ज्वलंत विषयावर भाष्य करणारी असल्यामुळे प्रेक्षकांना भावणारी होती. या साऱ्या आव्हानांना सर करत विभवांतर या एकांकिकेने सर्वोत्कृष्ट एकांकिका, सर्वोत्कृष्ट सांघिक अभिनय, सर्वोकृष्ट लेखक आणि सर्वोकृष्ट दिग्दर्शक अशी सर्वाधिक पारितोषिकं मिळवली. फिनिक्स मुंबईची 'मयसभा' या एकांकिकेच्या स्वप्निल टकले आणि अजित सावंत या जोडीने उत्कृष्ट नेपथ्यकाराचं पारितोषिक पटकावलं. सेकंडहँड या पुण्यातील समर्थ अकादमी यांनी सादर केलेल्या एकांकिकेने सर्वोत्कृष्ट एकांकिकेचा द्वितीय क्रमांक पटकावला तर सर्वोकृष्ट अभिनयाचा द्वितीय क्रमांक याच एकांकिकेच्या देवयानी मोरे यांनी मिळवला. सर्वोत्कृष्ट संगीतचं पारितोषिक सेकंडहँडच्या निनाद म्हेसाळकर यांना मिळालं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज