अ‍ॅपशहर

महाराष्ट्र केला 'उलट सुलट'

व्यावसायिक नाटकांचे दौरे हल्ली खूप कमी झाले आहेत असं बोललं जातं. मुंबई-पुण्यापलीकडे नाटकं फारशी जात नाहीत. पण, डिसेंबर महिन्यात व्यावसायिक रंगभूमीवर आलेलं 'उलट सुलट' हे नाटक सध्या संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतेय.

Maharashtra Times 29 Mar 2018, 11:40 am
कल्पेशराज कुबल, साठ्ये कॉलेज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ulat-sulat


व्यावसायिक नाटकांचे दौरे हल्ली खूप कमी झाले आहेत असं बोललं जातं. मुंबई-पुण्यापलीकडे नाटकं फारशी जात नाहीत. पण, डिसेंबर महिन्यात व्यावसायिक रंगभूमीवर आलेलं 'उलट सुलट' हे नाटक सध्या संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतेय. पुण्यात एकाच दिवशी शुभारंभाचे दोन हाऊसफुल्ल प्रयोग केल्यानंतर त्यांनी मराठवाड्याकडे मोर्चा वळवला. औरंगाबाद, नांदेड, लातूर, बीड, परळी यासारख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आत्तापर्यंत याचे प्रयोग झाले आहेत.

किरण मानेलिखित आणि कुमार सोहनीदिग्दर्शित 'उलट सुलट' या नाटकात कोरडवाहू शेतकऱ्याचे प्रश्न मांडण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारं हे नाटक सध्या खूप चर्चेत आहे. यानिमित्तानं शेतकऱ्यांचे प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचत आहेत, असं लेखक किरण माने सांगतो. स्वतः शेतकरी कुटुंबातला असल्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत अस्वस्थ होऊन किरणनं या नाटकाचं लेखन केलं होतं. 'नाम'च्या माध्यमातून शेतकऱ्यांचे अश्रू पुसणारे अभिनेते मकरंद अनासपुरे या नाटकात शेतकऱ्याच्या भूमिकेत दिसतायत.

मुंबई-पुण्यात प्रयोग करतानाच नाटकाचा हा आशय महाराष्ट्राच्या गावोगावी पोहोचावा म्हणून दर आठवड्याला 'उलट सुलट'ची बस मुंबईबाहेर निघते. गेल्या महिनाभरात उस्मानाबाद, नाशिक तसंच विदर्भात नागपूर, सावनेर, भद्रावती, आनंदवनात नाटकाचे प्रयोग झाले आहेत. पुढे पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, इस्लामपूर, तासगाव करत नाटकाच्या टीमनं संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याचं ठरवलं आहे. लवकरच या नाटकाचा सुवर्ण महोत्सावी प्रयोग मुंबईत होणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज