पुणे टाइन्स टीम
अभिनेता अजय देवगणचं एक वक्तव्य सध्या इंडस्ट्रीत फारच चर्चेचा विषय ठरलं आहे. ‘तुम्ही स्टार होण्याच्या मागे धावत असाल तर तुम्ही उत्तम अभिनेते होऊ शकत नाही’ असं अजयनं म्हटलं आहे. गेली काही वर्षं उत्तम सिनेमे देणाऱ्या अजयनं अचानक हे वक्तव्य का केलंय, याचा शोध घेतला जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सिनेमाच्या शूटिंगसाठी गेलेल्या अजयला भेटण्यासाठी अनेक उदयोन्मुख अभिनेते मंडळी भेटण्यासाठी आली होती. त्यांना अजयच्या अभिनयशैलीचा अभ्यास करायचा होता आणि एखाद्या विशिष्ट दृष्यांत तो कसा अभिनय करतो, हे पाहायचं होतं. अजयचं शूटिंग झाल्यानंतर त्यांनी त्याच्याशी संवाद साधला. अभिनय करणाऱ्यांना मुळात अभिनेती ही स्टार व्हायचं आहे हे ठरवायला हवं, असं अजयनं यावेळी त्यांना सांगितलं. अजय म्हणाला, ‘काही माणसं म्हणतात मला स्टार व्हायचं आहे. अशी मंडळी काहीच होऊ शकत नाहीत, असं मला वाटतं. तुम्हाला अभिनयात रस असेल तर तो तुम्हाला शिकावा लागतो आणि त्यानंतरच तो स्टार होऊ शकतो. इथं तुमच्याकडे पैशांपेक्षा गुणवत्ता असणं गरजेचं असतं. कितीतरी नवोदितांना योग्य संधी आणि व्यासपीठ मिळत नाहीत.’ उदयोन्मुख कलाकारांना आगामी सिनेमांमध्ये संधी देण्याचा अजयचा विचार आहे. त्यासाठीच त्यानं हे वक्तव्य केल्याची चर्चा आहे. अजयनं उपस्थित केलेला प्रश्न मात्र सर्वांनाच विचार करायला लावणारा आहे, एवढं नक्की.
अभिनेता अजय देवगणचं एक वक्तव्य सध्या इंडस्ट्रीत फारच चर्चेचा विषय ठरलं आहे. ‘तुम्ही स्टार होण्याच्या मागे धावत असाल तर तुम्ही उत्तम अभिनेते होऊ शकत नाही’ असं अजयनं म्हटलं आहे. गेली काही वर्षं उत्तम सिनेमे देणाऱ्या अजयनं अचानक हे वक्तव्य का केलंय, याचा शोध घेतला जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सिनेमाच्या शूटिंगसाठी गेलेल्या अजयला भेटण्यासाठी अनेक उदयोन्मुख अभिनेते मंडळी भेटण्यासाठी आली होती. त्यांना अजयच्या अभिनयशैलीचा अभ्यास करायचा होता आणि एखाद्या विशिष्ट दृष्यांत तो कसा अभिनय करतो, हे पाहायचं होतं. अजयचं शूटिंग झाल्यानंतर त्यांनी त्याच्याशी संवाद साधला. अभिनय करणाऱ्यांना मुळात अभिनेती ही स्टार व्हायचं आहे हे ठरवायला हवं, असं अजयनं यावेळी त्यांना सांगितलं. अजय म्हणाला, ‘काही माणसं म्हणतात मला स्टार व्हायचं आहे. अशी मंडळी काहीच होऊ शकत नाहीत, असं मला वाटतं. तुम्हाला अभिनयात रस असेल तर तो तुम्हाला शिकावा लागतो आणि त्यानंतरच तो स्टार होऊ शकतो. इथं तुमच्याकडे पैशांपेक्षा गुणवत्ता असणं गरजेचं असतं. कितीतरी नवोदितांना योग्य संधी आणि व्यासपीठ मिळत नाहीत.’ उदयोन्मुख कलाकारांना आगामी सिनेमांमध्ये संधी देण्याचा अजयचा विचार आहे. त्यासाठीच त्यानं हे वक्तव्य केल्याची चर्चा आहे. अजयनं उपस्थित केलेला प्रश्न मात्र सर्वांनाच विचार करायला लावणारा आहे, एवढं नक्की.