पुणे टाइम्स टीम
आमची पिढी नव्या कलाकारांबरोबर काम करताना कधीच असुरक्षित नसायची, पण आजच्या पिढीचं मात्र तसं नाही, असं म्हणत अभिनेता अजय देवगणनं नव्या कलाकारांवर टीका केली आहे. आजकाल कोणताच कलाकार दुसऱ्या आघाडीच्या कलाकाराबरोबर काम करायला तयार नसतो यावरून अजयनं त्यांना हा टोमणा मारला आहे. स्वततः अजयनं करिअरच्या ऐन बहरात असताना आमिर खानबरोबर ‘इश्क’ या सिनेमात, तर सलमानबरोबर ‘हम दिल दे चुके सनम’मध्ये काम केलं होतं.
अजय सध्या दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘गोलमाल अगेन’ या सिनेमात काम करत आहे. रोहितनं काही महिन्यांपूर्वी ‘राम-लखन’ सिनेमाचा रिमेक बनवणार असल्याचं जाहीर केलं होतं, मात्र आपल्यापेक्षा दुसरा हिरो उठून दिसेल या असुरक्षिततेच्या भावनेतून या सिनेमात काम करायला कुणीच तयार होत नव्हतं. म्हणून अखेर रोहितनं हा सिनेमा बनवण्याचा इरादाच रद्द केला. त्यावरून अजयनं त्याचं मत मांडलं. अजय म्हणाला, ‘ही पिढी अशी का वागते हे खरंतर त्यांनाच विचारायला हवं. मला वाटतं, ही पिढी जरा जास्तच गांभीर्यानं त्यांचं काम करते. तुम्ही दुसऱ्या कलाकाराबरोबर एकाच फ्रेममध्ये राहूनही उठावदार दिसू शकता हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यांना याची भीती का वाटते हेच कळत नाही. उलट एखाद्या व्यक्तीबरोबरचं तुमचं काम चांगलं झालं, तर तुम्ही आणखी उंचीवर जाता. आमची पिढी नशीबवान होती म्हणायची, कारण आमचा संघर्ष तितकाच प्रखर होता, पण इतकी स्पर्धा आम्ही नाही केली.’
आमची पिढी नव्या कलाकारांबरोबर काम करताना कधीच असुरक्षित नसायची, पण आजच्या पिढीचं मात्र तसं नाही, असं म्हणत अभिनेता अजय देवगणनं नव्या कलाकारांवर टीका केली आहे. आजकाल कोणताच कलाकार दुसऱ्या आघाडीच्या कलाकाराबरोबर काम करायला तयार नसतो यावरून अजयनं त्यांना हा टोमणा मारला आहे. स्वततः अजयनं करिअरच्या ऐन बहरात असताना आमिर खानबरोबर ‘इश्क’ या सिनेमात, तर सलमानबरोबर ‘हम दिल दे चुके सनम’मध्ये काम केलं होतं.
अजय सध्या दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘गोलमाल अगेन’ या सिनेमात काम करत आहे. रोहितनं काही महिन्यांपूर्वी ‘राम-लखन’ सिनेमाचा रिमेक बनवणार असल्याचं जाहीर केलं होतं, मात्र आपल्यापेक्षा दुसरा हिरो उठून दिसेल या असुरक्षिततेच्या भावनेतून या सिनेमात काम करायला कुणीच तयार होत नव्हतं. म्हणून अखेर रोहितनं हा सिनेमा बनवण्याचा इरादाच रद्द केला. त्यावरून अजयनं त्याचं मत मांडलं. अजय म्हणाला, ‘ही पिढी अशी का वागते हे खरंतर त्यांनाच विचारायला हवं. मला वाटतं, ही पिढी जरा जास्तच गांभीर्यानं त्यांचं काम करते. तुम्ही दुसऱ्या कलाकाराबरोबर एकाच फ्रेममध्ये राहूनही उठावदार दिसू शकता हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यांना याची भीती का वाटते हेच कळत नाही. उलट एखाद्या व्यक्तीबरोबरचं तुमचं काम चांगलं झालं, तर तुम्ही आणखी उंचीवर जाता. आमची पिढी नशीबवान होती म्हणायची, कारण आमचा संघर्ष तितकाच प्रखर होता, पण इतकी स्पर्धा आम्ही नाही केली.’