आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचं शुभमंगल आता ठरलं, डिसेंबरमध्ये ही जोडी बोहल्यावर चढणार अशा चर्चा गेल्या आठवड्यात जोरावर होत्या. सोशल मीडियावर त्याविषयी खूप बोललं गेलं. पण, नेहमीप्रमाणे सारं काही हवेतच विरलं आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखातीत आलियानं या चर्चेतली हवा काढून घेतली. ती म्हणाली, की ‘अशा बातम्या दर दुसऱ्या आठवड्याला माझ्या कानांवर पडतात. या चर्चांनी माझंही मनोरंजन होतं. रणबीर एक चांगला मुलगा आहे. आम्ही जेव्हा लग्न करू तेव्हा नक्की सगळ्यांना सांगू.’
तेव्हा नक्की सांगू!
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचं शुभमंगल आता ठरलं, डिसेंबरमध्ये ही जोडी बोहल्यावर चढणार अशा चर्चा गेल्या आठवड्यात जोरावर होत्या.
महाराष्ट्र टाइम्स 21 Feb 2020, 4:05 pm