दागिने म्हणजे मुलींसाठी जीव की प्राण. त्यातच लग्न झाल्यानंतर तर दागिन्यांकडे स्त्रियांचं खास लक्ष असतं. अभिनेत्री अमृता खानविलकर हिने याबद्दलचा तिचा स्वतःचा एक किस्सा नुकताच सांगितला. लग्नापूर्वी अमृताला दागिन्यांची फारशी आवड नव्हती. पण लग्नानंतर मात्र तिला अचानक दागिने आवडू लागले. 'माझा नवरा पंजाबी आहे. लग्नानंतर अंगठी शोधण्याचा एक विधी होता. त्यासाठी सकाळी माझ्या सासूबाईंनी मला त्यांचं पारंपरिक सोन्याचं कडं दिलं होतं. ते इतकं छान होतं की मला खूप आवडलं. विधी झाल्यावर त्यांनी ते माझ्याकडे परत मागितलं. ते हातातून काढून द्यायची माझी इच्छा होईना. आणि तेव्हाच मला दागिन्यांचं खरं महत्व कळलं. आता माझं दागिन्यांवरचं प्रेम जरा जास्तच वाढलं आहे', असं अमृता सांगते.
आवड तिला दागिन्यांची
त्यासाठी सकाळी माझ्या सासूबाईंनी मला त्यांचं पारंपरिक सोन्याचं कडं दिलं होतं. ते इतकं छान होतं की मला खूप आवडलं. विधी झाल्यावर त्यांनी ते माझ्याकडे परत मागितलं. ते हातातून काढून द्यायची माझी इच्छा होईना. आणि तेव्हाच मला दागिन्यांचं खरं महत्व कळलं. आता माझं दागिन्यांवरचं प्रेम जरा जास्तच वाढलं आहे', असं अमृता सांगते.
Maharashtra Times 24 Sep 2016, 12:12 am