'नील बटे सन्नाटा'मधून दिग्दर्शक अश्विनी अय्यर-तिवारीनं सगळ्यांची वाहवा मिळवली. विशेषतः निर्मितीच्या क्षेत्रात उतरलेल्या दिग्दर्शक आनंद राय यांना तर तिचं काम फारच आवडलंय. इतकं की आता त्यांच्या आगामी 'मनमर्झिया'चा दिग्दर्शकच त्यांनी बदलून टाकला आहे. आयुषमान खुराना आणि भूमी पेडणेकर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन आधी समीर शर्मा करत होता. उत्तर भारतात या चित्रपटाचं महिनाभर शूटिंगही झालं होतं. पण आता चक्र फिरली आणि सगळी सूत्रं अश्विनीच्या हातात आली. ती हा सगळा भाग आता नव्यानं शूट करणार असल्याचं समजतं.
समीर आऊट, अश्विनी इन
'नील बटे सन्नाटा'मधून दिग्दर्शक अश्विनी अय्यर-तिवारीनं सगळ्यांची वाहवा मिळवली. विशेषतः निर्मितीच्या क्षेत्रात उतरलेल्या दिग्दर्शक आनंद राय यांना तर तिचं काम फारच आवडलंय. इतकं की आता त्यांच्या आगामी 'मनमर्झिया'चा दिग्दर्शकच त्यांनी बदलून टाकला आहे.
Maharashtra Times 30 Jun 2016, 12:56 am