अभिनेत्री बरखा बिश्तचा मूड गेला आहे. त्याला कारणच तसं आहे ना. अलीकडेच तिची हिऱ्याची एक अंगठी हरवली. मॅडमला खूप दुःख होणं स्वाभाविकच आहे. कारण त्याची किंमत होती जवळपास साडेतीन लाख रुपये. त्याहून महत्त्वाचं म्हणजे तिच्या नवऱ्यानं ही अंगठी तिला भेट दिली होती. इंद्रनीलनं लग्नाच्यावेळी ही अंगठी तिला खास भेट म्हणून दिली होती. झालं असं, की बरखा सध्या ‘नामकरण’ मालिकेत प्रमुख भूमिकेत काम करतेय. मालिकेचं आऊटडोअर शूट सुरू होतं. तेव्हा शूटदरम्यान ही अंगठी हरवली. त्यामुळे सेटवर फार गोंधळ माजला. बरखाला हे समजलं तोवर पॅकअप झालं होतं. तरीसुद्धा काही तास सेटवर शोधाशोध झाली. पण शेवटपर्यंत या सुंदरीला तिची ही अमूल्य आठवण काही सापडली नाही.
आठवण हरवली
अभिनेत्री बरखा बिश्तचा मूड गेला आहे. त्याला कारणच तसं आहे ना. अलीकडेच तिची हिऱ्याची एक अंगठी हरवली. मॅडमला खूप दुःख होणं स्वाभाविकच आहे. कारण त्याची किंमत होती जवळपास साडेतीन लाख रुपये. त्याहून महत्त्वाचं म्हणजे तिच्या नवऱ्यानं ही अंगठी तिला भेट दिली होती. इंद्रनीलनं लग्नाच्यावेळी ही अंगठी तिला खास भेट म्हणून दिली होती.
Maharashtra Times 20 Oct 2016, 12:12 am