पानी फाऊंडेशनतर्फे घेण्यात येणाऱ्या वॉटर कप स्पर्धेशी अनेक मराठी कलाकारही जोडले गेले आहेत. कॉमेडी स्टार भारत गणेशपुरेही या निमित्तानं वर्ध्यातल्या आर्वी तालुक्यात जाऊन पोहोचले. जलसंधारणाच्या कामात लोक उत्साहानं सहभागी होत असल्याचं भारत यांनी त्यांच्या वैदर्भीय शैलीत कौतुक केलं. 'शेतकरी सध्या भयंकर परिस्थितीला समोरं जात आहेत. या प्रसंगी कुणी स्वतःला एकटं समजू नये. त्याबाबत अधिकाधिक बोलतं व्हावं', असं ते सांगत, शेतकऱ्यांनी आत्महत्येचा विचारही करू नये असा संदेश दिला.
आम्ही आहोत तुमच्यासोबत
या प्रसंगी कुणी स्वतःला एकटं समजू नये. त्याबाबत अधिकाधिक बोलतं व्हावं', असं ते सांगत, शेतकऱ्यांनी आत्महत्येचा विचारही करू नये असा संदेश दिला.
Maharashtra Times 29 Apr 2017, 1:04 pm