प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संदेश अनेक कलाकार देत आहेत. आमिर खाननंही सर्वांना तेच आवाहन केलं आहे. 'आपल्या आनंदाच्या कल्पना थोड्या बदलून फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा. लहान मुलं हट्ट करतात, पण त्यांना समजावून सांगण्याची जबाबदारी आपली आहे. फटाक्यांच्या आवाजामुळे आणि धुरामुळे कुणाला त्रास होऊ नये ही जबाबदारी आपली आहे', असं तो सांगतो. महाराष्ट्रात सध्या दुष्काळसदृश परिस्थिती आहे. हे आव्हान आपल्यासमोर असून, यंदा पाण्यासाठीचं काम वाढलं आहे. दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी सज्ज होऊ या असंही त्यानं म्हटलं आहे.
बदलू आनंदाच्या कल्पना
प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संदेश अनेक कलाकार देत आहेत आमिर खाननंही सर्वांना तेच आवाहन केलं आहे...
Maharashtra Times 6 Nov 2018, 4:00 am