अ‍ॅपशहर

नो स्वीट्स प्लीज

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतून दिलीप जोशी घराघरांत पोहोचले. गेल्या दोन वर्षांपासून वजन ‘ताब्यात’ ठेवण्यासाठी त्यांनी गोड वर्ज्य केलंय.

Maharashtra Times 25 May 2016, 12:10 am
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतून दिलीप जोशी घराघरांत पोहोचले. गेली अनेक वर्षं सुरू असलेल्या या मालिकेने लोकप्रियता टिकवून ठेवली आहे. गेली अनेक वर्षं जोशी यांचा वाढदिवस सेटवर साजरा होतो. तसा यंदाही तो २६ मेला साजरा होणार आहे. त्याची जोरदार तयारी सध्या चालू आहे. पण गेल्या दोन वर्षांपासून वजन ‘ताब्यात’ ठेवण्यासाठी त्यांनी गोड वर्ज्य केलंय. या दिवशी मात्र सेटवर गोडधोडाची रेलचेल असते. सगळे कलाकार जेवणावर मस्त ताव मारतात. पण, ‘जेठालाल’ मात्र शांत असतो. नाही म्हणायला, मुलांनी आणलेला केक मात्र ते प्रेमाने खातात. तेवढीच काय ती त्यांची गोडाशी ते जवळीक असते. बाकी पूर्ण वर्षभर गोडापासून ते लांबच राहतात.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज