‘ये है मोहोब्बते’ या मालिकेतून दिव्यांका त्रिपाठीनं लाखो प्रेक्षकांची मनं जिंकली. संवेदनशील अभिनेत्री अशी ओळख असलेल्या दिव्यांकाला एका गोष्टीमुळे खूप संताप येतो. नुकतीच याबाबत ती सोशल मीडियावर व्यक्त झाली. मुलींवर होणाऱ्या बलात्काराच्या घटनांबाबत तिनं चीड व्यक्त केली. या घटना पाहिल्या की मुलीचं पालकत्वच नको असं वाटू लागतं, असं ती संतापून लिहिते. तिनं थेट पंतप्रधानांना उद्देशून याबाबतचं ट्विट केलंय. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली पाहिजे, अशी मागणी तिनं केली आहे.
कठोर शिक्षा द्या!
संवेदनशील अभिनेत्री अशी ओळख असलेल्या दिव्यांकाला एका गोष्टीमुळे खूप संताप येतो. नुकतीच याबाबत ती सोशल मीडियावर व्यक्त झाली.
Maharashtra Times 18 Aug 2017, 3:40 am