टीव्हीवर ‘यह रिश्ता क्या कहलाता’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. साहजिकच या मालिकेतले अनेक कलाकारही लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. यातलीच एक आहे, हिना खान. अर्थात या मालिकेत ती अक्षरा सिंघानियाची व्यक्तिरेखा साकारते आहे. मिळालेल्या माहितीनुसार हिनाला आपल्या भूमिकेबद्दल अनेक शंका होत्या. त्यातूनच हा रोल साकारताना तिचा निर्मात्यांसोबत वादही झाला होता. म्हणूनच अखेरचा पर्याय म्हणून या मालिकेत तिचा मृत्यू दाखवण्यात येणार आहे. हा मृत्यू नेमका कसा असेल, याबद्दल मात्र ठोस काहीही सांगितलं जात नाहीय. पण लवकरच अक्षराला प्रेक्षक कायमचा अलविदा करतील.
अक्षराचा अलविदा
मिळालेल्या माहितीनुसार हिनाला आपल्या भूमिकेबद्दल अनेक शंका होत्या. त्यातूनच हा रोल साकारताना तिचा निर्मात्यांसोबत वादही झाला होता. म्हणूनच अखेरचा पर्याय म्हणून या मालिकेत तिचा मृत्यू दाखवण्यात येणार आहे. हा मृत्यू नेमका कसा असेल, याबद्दल मात्र ठोस काहीही सांगितलं जात नाहीय. पण लवकरच अक्षराला प्रेक्षक कायमचा अलविदा करतील.
Maharashtra Times 12 Nov 2016, 12:12 am