'जमाई राजा'फेम अभिनेता रवी दुबे सध्या खूप भावुक झालाय. त्याला कारणच तसं आहे ना. मार्चच्या पहिल्या आठवड्यात ७०० भाग पूर्ण करत त्याची ही मालिका प्रेक्षकांना अलविदा करतेय. 'माझ्यासाठी ही मालिका गेम चेन्जर असून, अभिनेता म्हणून माझ्यात खूप सुधारणा झाली आहे. हे ७०० भाग माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण आहेत' असं तो सांगतो. अडीच वर्षांच्या काळात तीन सीझन्समध्ये रवीनं प्रेक्षकांची मनं जिंकली. या सगळ्या प्रवासात त्याचे वीसहून अधिक लूक्सही दिसले.
अलविदा 'जमाई राजा'
हे ७०० भाग माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण आहेत' असं तो सांगतो. अडीच वर्षांच्या काळात तीन सीझन्समध्ये रवीनं प्रेक्षकांची मनं जिंकली. या सगळ्या प्रवासात त्याचे वीसहून अधिक लूक्सही दिसले.
Maharashtra Times 1 Mar 2017, 12:02 am