हल्ली सिनेमा थिएटरवर येण्याआधीच मोबाइलवर दिसू लागतो. तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे एकामागोमाग एक चित्रपट लिक होतायत. त्यामुळे बॉलिवूडच्या बड्या कलाकारांनाही धडकी भरलीय. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात याबद्दल विचारलं असता, अभिनेत्री कंगना रनोट हिने स्पष्ट शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली. 'कोणताही सिनेमा बनवण्यामागे अनेकांची मेहनत असते, विचार असतात. सिनेमा अशा पद्धतीने लोकांसमोर येणं, तो लिक होणं ही खूप चुकीची गोष्ट आहे. अवघ्या काही मिनिटांत सिनेमा डाऊनलोड होत असला तर आमच्या मेहनतीचं काय?' असा सवाल तिने केला. स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या कंगनाचं हे सडेतोड म्हणणं ऐकल्यावर सगळ्यांनीच तिला पाठिंबा दिला.
आमच्या मेहनतीचं काय?
हल्ली सिनेमा थिएटरवर येण्याआधीच मोबाइलवर दिसू लागतो. तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे एकामागोमाग एक चित्रपट लिक होतायत. त्यामुळे बॉलिवूडच्या बड्या कलाकारांनाही धडकी भरलीय. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात याबद्दल विचारलं असता, अभिनेत्री कंगना रनोट हिने स्पष्ट शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली. 'कोणताही सिनेमा बनवण्यामागे अनेकांची मेहनत असते, विचार असतात. सिनेमा अशा पद्धतीने लोकांसमोर येणं, तो लिक होणं ही खूप चुकीची गोष्ट आहे. अवघ्या काही मिनिटांत सिनेमा डाऊनलोड होत असला तर आमच्या मेहनतीचं काय?' असा सवाल तिने केला. स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या कंगनाचं हे सडेतोड म्हणणं ऐकल्यावर सगळ्यांनीच तिला पाठिंबा दिला.
Maharashtra Times 23 Jul 2016, 12:38 am