कॉमेडियन कपिल शर्माचा नुकताच येऊन गेलेला ‘फिरंगी’ सिनेमा दोनच दिवसात सपशेल आपटला. या सिनेमावर समीक्षकांनी नाहक टीका केल्यामुळे चाहत्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला नाही, असं कपिल म्हणतोय. ‘इंग्रजी शाळांत शिकलेले चार-पाच समीक्षक आपली मतं प्रेक्षकांवर थोपतात, याचं मला खूप दुःख होतं. मला वाटतं, सिनेमा आधी जनतेनंच पाहायला हवा. या समीक्षकांमुळे चांगला, निखळ मनोरंजन करणारा सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचलाच नाही’, असं तो म्हणतो.
... म्हणून कपिल शर्मा समीक्षकांवर वैतागला
कॉमेडियन कपिल शर्माचा नुकताच येऊन गेलेला ‘फिरंगी’ सिनेमा दोनच दिवसात सपशेल आपटला. या सिनेमावर समीक्षकांनी नाहक टीका केल्यामुळे चाहत्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला नाही, असं कपिल म्हणतोय.
Maharashtra Times 21 Dec 2017, 4:00 am