मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महापालिकांच्या निवडणुका घोषित झाल्यापासून युतीचं काय होणार, हा लाखमोलाचा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात असताना तिकडं बॉलिडूमध्ये २५ वर्षांची युती तुटली आहे. गेली २५ वर्षे बॉलिवूडमध्ये ज्यांची मैत्री सर्वांसाठी एक उदाहरण बनून होती, ती अखेर तुटली आहे. चित्रपट निर्माता करण जोहर व अभिनेत्री काजोल यांच्यात कायमचा दुरावा आल्याची चर्चा आहे.
'अॅन अनसुटेबल बॉय' या आत्मचरित्रात करण जोहर यानं तशी कबुली दिल्याचं बोललं जात आहे. केजोच्या 'ऐ दिल है मुश्किल' आणि अजय देवगणची निर्मिती असलेल्या 'शिवाय' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखांवरून त्यांच्यात वादाची ठिणगी पडल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. ती अफवा असल्याचं आतापर्यंत समजलं जात होतं. मात्र, करणच्या कबुलीमुळं त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. करण-केजोमध्ये वितुष्ट येण्याचं कारण अजय देवगण असल्याचं करण जोहरनं त्याच्या पुस्तकात नमूद केल्याचं सांगितलं जातंय.
अजय देवगणचा 'शिवाय' चित्रपट पाडण्यासाठी करण जोहरनं कमाल आर. खानला लाच दिल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी मीडियात होती. काजोलनं त्यावर धक्का बसल्याची प्रतिक्रिया दिली होती. ती करण आणि काजोलच्या मैत्रीमध्ये अखेरची काडी होती, असंही करणनं पुस्तकात लिहिलंय. त्या संदर्भातील मजकूर सोशल मीडियावर फिरत आहे. मात्र, तो करणच्याच पुस्तकातील आहे का, याची खातरजमा होऊ शकलेली नाही.
महापालिकांच्या निवडणुका घोषित झाल्यापासून युतीचं काय होणार, हा लाखमोलाचा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात असताना तिकडं बॉलिडूमध्ये २५ वर्षांची युती तुटली आहे. गेली २५ वर्षे बॉलिवूडमध्ये ज्यांची मैत्री सर्वांसाठी एक उदाहरण बनून होती, ती अखेर तुटली आहे. चित्रपट निर्माता करण जोहर व अभिनेत्री काजोल यांच्यात कायमचा दुरावा आल्याची चर्चा आहे.
'अॅन अनसुटेबल बॉय' या आत्मचरित्रात करण जोहर यानं तशी कबुली दिल्याचं बोललं जात आहे. केजोच्या 'ऐ दिल है मुश्किल' आणि अजय देवगणची निर्मिती असलेल्या 'शिवाय' चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखांवरून त्यांच्यात वादाची ठिणगी पडल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. ती अफवा असल्याचं आतापर्यंत समजलं जात होतं. मात्र, करणच्या कबुलीमुळं त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. करण-केजोमध्ये वितुष्ट येण्याचं कारण अजय देवगण असल्याचं करण जोहरनं त्याच्या पुस्तकात नमूद केल्याचं सांगितलं जातंय.
अजय देवगणचा 'शिवाय' चित्रपट पाडण्यासाठी करण जोहरनं कमाल आर. खानला लाच दिल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी मीडियात होती. काजोलनं त्यावर धक्का बसल्याची प्रतिक्रिया दिली होती. ती करण आणि काजोलच्या मैत्रीमध्ये अखेरची काडी होती, असंही करणनं पुस्तकात लिहिलंय. त्या संदर्भातील मजकूर सोशल मीडियावर फिरत आहे. मात्र, तो करणच्याच पुस्तकातील आहे का, याची खातरजमा होऊ शकलेली नाही.