पुणे टाइम्स टीम
वेबसीरिजनं तरुण प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. त्यांचेच विषय या माध्यमांत येत असल्याने ते त्याच्याशी कनेक्ट होतात. मात्र, याचा अर्थ टीव्हीचे महत्त्व कमी झालं आहे असं नाही. तरुण प्रेक्षक वेबसीरिज पाहण्याचं प्रमाण वाढलं असून, गृहिणी, नोकरदार महिला यांच्यासाठी टीव्ही हेच मनोरंजनाचं माध्यम आहे. त्यामुळे भविष्यातही टीव्हीची जागा वेबचॅनेल्स घेणार नाहीत. वेबसीरिजकडे फक्त पर्याय म्हणून पाहिलं जाईल,' असं मत प्रसिद्ध टीव्ही कलाकार करण व्ही. ग्रोव्हरनं व्यक्त केलं.
'सुपरस्टार' या वेबसीरिजचा दुसरा सीझन लवकरच सुरू होत आहे. त्या निमित्त झालेल्या मुलाखतीत करणनं वेबसीरिज या नव्या माध्यमाच्या ताकदीविषयी सांगितलं. 'या मालिकेमध्ये मी यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या; पण यश हाताळू न शकणाऱ्या संगीतकाराची भूमिका केली आहे. या भूमिकेचं स्वरूप आक्रमक असून, मी आत्तापर्यंत केलेल्या सालस अभिनेत्यांच्या तुलनेत माझ्यासाठी आव्हानात्मक होतं. प्रत्यक्ष आयुष्यातही मी स्वत:ला असं पाहात नाही. त्यामुळे एका बिघडलेल्या रॉकस्टारच्या वाईट सवयींचा अभिनय करण्यासाठी मला निरीक्षण करावं लागलं, त्यानुसार देहबोलीचंही अनुकरण केलं,' असं करणनं 'पुणे टाइम्स'ला सांगितलं. करणनं आत्तापर्यंत 'सारथी', 'यहां में घर घर खेली', 'पुनर्विवाह', 'हमारी बहू रजनीकांत' अशा वेगळ्या आशयाच्या मालिकांमध्ये काम केलं आहे. यामध्ये तद्दन फॅमिली ड्रामा, रडगाणं नव्हतं. 'साचेबद्ध मालिका मलाच नको होत्या, त्यामुळे मी केल्या नाहीत आणि ऑफरही झाल्या नाहीत,' असं तो सांगतो.
गोंधळ आणि किस्से
करण सिंग ग्रोव्हर आणि करण व्ही. ग्रोव्हर हे दोन वेगळे कलाकार; पण नामसाधर्म्यामुळे गोंधळ उडतो का याबाबत करणने, 'अनेकदा मला करण सिंग ग्रोव्हरसाठी फोन येतात; पण मी त्यांना तो मी नव्हे, असं प्रेमानं सांगतो. तो करण 'दिल मिल गए' करत असताना गोंधळाचे अनेक किस्से घडले. आता मात्र तो सिनेमांकडे वळल्याने गोंधळ कमी झाला आहे,' असंही करण हसत-हसत सांगतो.
वेबसीरिजनं तरुण प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. त्यांचेच विषय या माध्यमांत येत असल्याने ते त्याच्याशी कनेक्ट होतात. मात्र, याचा अर्थ टीव्हीचे महत्त्व कमी झालं आहे असं नाही. तरुण प्रेक्षक वेबसीरिज पाहण्याचं प्रमाण वाढलं असून, गृहिणी, नोकरदार महिला यांच्यासाठी टीव्ही हेच मनोरंजनाचं माध्यम आहे. त्यामुळे भविष्यातही टीव्हीची जागा वेबचॅनेल्स घेणार नाहीत. वेबसीरिजकडे फक्त पर्याय म्हणून पाहिलं जाईल,' असं मत प्रसिद्ध टीव्ही कलाकार करण व्ही. ग्रोव्हरनं व्यक्त केलं.
'सुपरस्टार' या वेबसीरिजचा दुसरा सीझन लवकरच सुरू होत आहे. त्या निमित्त झालेल्या मुलाखतीत करणनं वेबसीरिज या नव्या माध्यमाच्या ताकदीविषयी सांगितलं. 'या मालिकेमध्ये मी यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या; पण यश हाताळू न शकणाऱ्या संगीतकाराची भूमिका केली आहे. या भूमिकेचं स्वरूप आक्रमक असून, मी आत्तापर्यंत केलेल्या सालस अभिनेत्यांच्या तुलनेत माझ्यासाठी आव्हानात्मक होतं. प्रत्यक्ष आयुष्यातही मी स्वत:ला असं पाहात नाही. त्यामुळे एका बिघडलेल्या रॉकस्टारच्या वाईट सवयींचा अभिनय करण्यासाठी मला निरीक्षण करावं लागलं, त्यानुसार देहबोलीचंही अनुकरण केलं,' असं करणनं 'पुणे टाइम्स'ला सांगितलं. करणनं आत्तापर्यंत 'सारथी', 'यहां में घर घर खेली', 'पुनर्विवाह', 'हमारी बहू रजनीकांत' अशा वेगळ्या आशयाच्या मालिकांमध्ये काम केलं आहे. यामध्ये तद्दन फॅमिली ड्रामा, रडगाणं नव्हतं. 'साचेबद्ध मालिका मलाच नको होत्या, त्यामुळे मी केल्या नाहीत आणि ऑफरही झाल्या नाहीत,' असं तो सांगतो.
गोंधळ आणि किस्से
करण सिंग ग्रोव्हर आणि करण व्ही. ग्रोव्हर हे दोन वेगळे कलाकार; पण नामसाधर्म्यामुळे गोंधळ उडतो का याबाबत करणने, 'अनेकदा मला करण सिंग ग्रोव्हरसाठी फोन येतात; पण मी त्यांना तो मी नव्हे, असं प्रेमानं सांगतो. तो करण 'दिल मिल गए' करत असताना गोंधळाचे अनेक किस्से घडले. आता मात्र तो सिनेमांकडे वळल्याने गोंधळ कमी झाला आहे,' असंही करण हसत-हसत सांगतो.