पुणे टाइम्स टीम
बरीच चर्चा आणि वाद- विवादांनंतर ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षक आणि समीक्षकांची प्रशंसाही मिळाली. सिनेमाची निर्माती एकता कपूरनंही तिच्या टीमबरोबर सिनेमाचं यश साजरं केलं. यावेळेस तिनं सिनेमावरून झालेल्या वादाबद्दल आपली मतं खुलेपणानं मांडली.
एकता म्हणाली, ‘या सिनेमाच्या यशानं मला सगळ्यात जास्त आनंद झाला आहे. असा आनंद मला बऱ्याच दिवसांनी मिळाला आहे. सगळ्या रिसर्च एजन्सीजनी मला सांगितलं होतं की सिनेमाला चांगलं ओपनिंग मिळणार नाही, फक्त मुलींचीच गोष्ट मांडणारा सिनेमा चालणार नाही वगैरे. कुणी म्हणालं की हा फक्त सिनेमा महोत्सवात दाखवण्यासारखा सिनेमा आहे. मला ही विभागणी समजतच नाही. माझ्या मते सिनेमा एकतर चांगला असतो किंवा वाईट. बऱ्याचदा प्रेक्षकांना मुर्ख समजलं जातं, पण तसं नाहीये. लोकांना हा सिनेमा आवडला आहे.
या सिनेमाच्या यशानं अशा प्रकारच्या सिनेमांसाठी वाट खुली झाली आहे. या सिनेमामुळे चार लोकांच्या आयुष्यातही बदल झाला, तरी मी असे सिनेमे बनवत राहीन. मी व्यावसायिक निर्माती आहे. मी मनोरंजन करणारे सिनेमे बनवत राहीन आणि पैसेही कमवेन.’ एकतानं हा सिनेमा पाहून मग त्याची निर्माती म्हणून सिनेमा प्रमोट करायचं ठरवलं. ती म्हणाली, ‘प्रकाश झा यांनी कथा ऐकवून सिनेमा दाखवला तेव्हा तो पाहून आम्हा सगळ्यांनाच ही कलाकृती एवढी आवडली की त्यात आपण असायलाच हवं आहे हे आम्ही ठरवलं. सिनेमात मनोरंजन, वास्तव आणि व्यावसायिकता याची खूपच सुंदर सांगड दिग्दर्शिका अलंकृतानं घातली आहे. त्यामुळे या सिनेमाच्या पाठीमागे उभं राहायचा निर्णय आम्ही घेतला. हा सिनेमा रसिकांना आवडतोय यातच सगळं काही आलं. एकतर असे सिनेमे सारखे होत नाहीत त्यामुळे यातल्या कलावंतांसह सिनेमासाठी जोडलेल्या सगळ्यांचेच मी आभार मानते. लोक काय म्हणतात याने काहीही फरक पडत नाही.’
बरीच चर्चा आणि वाद- विवादांनंतर ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षक आणि समीक्षकांची प्रशंसाही मिळाली. सिनेमाची निर्माती एकता कपूरनंही तिच्या टीमबरोबर सिनेमाचं यश साजरं केलं. यावेळेस तिनं सिनेमावरून झालेल्या वादाबद्दल आपली मतं खुलेपणानं मांडली.
एकता म्हणाली, ‘या सिनेमाच्या यशानं मला सगळ्यात जास्त आनंद झाला आहे. असा आनंद मला बऱ्याच दिवसांनी मिळाला आहे. सगळ्या रिसर्च एजन्सीजनी मला सांगितलं होतं की सिनेमाला चांगलं ओपनिंग मिळणार नाही, फक्त मुलींचीच गोष्ट मांडणारा सिनेमा चालणार नाही वगैरे. कुणी म्हणालं की हा फक्त सिनेमा महोत्सवात दाखवण्यासारखा सिनेमा आहे. मला ही विभागणी समजतच नाही. माझ्या मते सिनेमा एकतर चांगला असतो किंवा वाईट. बऱ्याचदा प्रेक्षकांना मुर्ख समजलं जातं, पण तसं नाहीये. लोकांना हा सिनेमा आवडला आहे.
या सिनेमाच्या यशानं अशा प्रकारच्या सिनेमांसाठी वाट खुली झाली आहे. या सिनेमामुळे चार लोकांच्या आयुष्यातही बदल झाला, तरी मी असे सिनेमे बनवत राहीन. मी व्यावसायिक निर्माती आहे. मी मनोरंजन करणारे सिनेमे बनवत राहीन आणि पैसेही कमवेन.’ एकतानं हा सिनेमा पाहून मग त्याची निर्माती म्हणून सिनेमा प्रमोट करायचं ठरवलं. ती म्हणाली, ‘प्रकाश झा यांनी कथा ऐकवून सिनेमा दाखवला तेव्हा तो पाहून आम्हा सगळ्यांनाच ही कलाकृती एवढी आवडली की त्यात आपण असायलाच हवं आहे हे आम्ही ठरवलं. सिनेमात मनोरंजन, वास्तव आणि व्यावसायिकता याची खूपच सुंदर सांगड दिग्दर्शिका अलंकृतानं घातली आहे. त्यामुळे या सिनेमाच्या पाठीमागे उभं राहायचा निर्णय आम्ही घेतला. हा सिनेमा रसिकांना आवडतोय यातच सगळं काही आलं. एकतर असे सिनेमे सारखे होत नाहीत त्यामुळे यातल्या कलावंतांसह सिनेमासाठी जोडलेल्या सगळ्यांचेच मी आभार मानते. लोक काय म्हणतात याने काहीही फरक पडत नाही.’