लग्न झालं की मुलीने आपल्या नवऱ्याचं आडनाव लावावं ही पद्धत आपल्याकडे आहे. हल्ली मुली सासरचं आणि माहेरचं अशी दोन्ही आडनावं लावतात. अभिनेत्री माही वीज मात्र लग्नानंतरही तिचं आधीचंच आडनाव लावणार आहे. त्यामुळे नवरा जय भानूशाली आणि तिच्यामध्ये खटके उडत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण या सगळ्यावर पडदा टाकत माहीनं भानुशाली आडनाव न लावण्यामागचं कारण सांगितलं. ‘वीज हे मला बाबांमुळे मिळालेलं आडनाव आहे आणि ती माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. प्रत्येक मुलीसाठी तिचे बाबा सुपरहिरो असतात. ते कायम माझ्या पाठीशी असल्याच्या भावनेतून मी आडनाव न बदलण्याचा निर्णय घेतला आहे’, असं ती म्हणते.
म्हणून आडनाव नाही बदललं
‘वीज हे मला बाबांमुळे मिळालेलं आडनाव आहे आणि ती माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. प्रत्येक मुलीसाठी तिचे बाबा सुपरहिरो असतात. ते कायम माझ्या पाठीशी असल्याच्या भावनेतून मी आडनाव न बदलण्याचा निर्णय घेतला आहे’, असं ती म्हणते.
Maharashtra Times 28 May 2016, 12:26 am