मुंबई:
'इथं टिकायचं, तर गेंड्याची कातडी हवी', असं सूचक विधान राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता मनोज वाजपेयीनं नुकतंच केलं आहे.
चित्रपटसृष्टीत टिकून राहाण्यासाठी तुमचा मंत्र काय आहे? असा प्रश्न मनोज वाजपेयीला एका चर्चासत्रादरम्यान विचारण्यात आला. त्याच्याकडे काम नव्हते अशा दिवसांतील एक किस्सा सांगत मनोज वाजपेयीनं या प्रश्नाचे उत्तर दिले.'माझ्या एका मित्रानं मला त्याच्या चित्रपटाच्या प्रिमिअरसाठी बोलावले होते. त्या शोसाठी मीडिया, फोटोग्राफर सगळे उपस्थित होते. त्यांनी मला पाहिले आणि एक फोटोग्राफर पटकन म्हणाला, हा फार महत्त्वाचा अभिनेता नाही, त्याचे फोटो काढण्यात वेळ वाया नका घालवू.'
यश मिळालं की मित्रमैत्रिणी मिळतात आणि अपयशानं ते आपोआप दूर होतात,असंही सांगत त्यानं बॉलिवूडमधल्या खोटेपणाबद्दलची भावना व्यक्त केली आहे. त्यानं असं का म्हटलंय ते मात्र कळलेलं नाही. त्याच्या या विधानावरून उलट सुलट चर्चा मात्र सुरू झाल्या आहेत.
'इथं टिकायचं, तर गेंड्याची कातडी हवी', असं सूचक विधान राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता मनोज वाजपेयीनं नुकतंच केलं आहे.
चित्रपटसृष्टीत टिकून राहाण्यासाठी तुमचा मंत्र काय आहे? असा प्रश्न मनोज वाजपेयीला एका चर्चासत्रादरम्यान विचारण्यात आला. त्याच्याकडे काम नव्हते अशा दिवसांतील एक किस्सा सांगत मनोज वाजपेयीनं या प्रश्नाचे उत्तर दिले.'माझ्या एका मित्रानं मला त्याच्या चित्रपटाच्या प्रिमिअरसाठी बोलावले होते. त्या शोसाठी मीडिया, फोटोग्राफर सगळे उपस्थित होते. त्यांनी मला पाहिले आणि एक फोटोग्राफर पटकन म्हणाला, हा फार महत्त्वाचा अभिनेता नाही, त्याचे फोटो काढण्यात वेळ वाया नका घालवू.'
यश मिळालं की मित्रमैत्रिणी मिळतात आणि अपयशानं ते आपोआप दूर होतात,असंही सांगत त्यानं बॉलिवूडमधल्या खोटेपणाबद्दलची भावना व्यक्त केली आहे. त्यानं असं का म्हटलंय ते मात्र कळलेलं नाही. त्याच्या या विधानावरून उलट सुलट चर्चा मात्र सुरू झाल्या आहेत.