सोनाक्षी सिन्हा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘नच बलिये’च्या आठव्या सीझनची ती निवेदक असल्यामुळे अनेक माध्यमांना ती मुलाखती देत सुटलीय. त्यातच तिच्या लग्नाची चर्चाही जोरावर आहे. याबाबत मात्र ती निवांत आहे. ‘लोकांना काय हवं ते बोलू द्या. मी या इंडस्ट्रीत आले तेव्हाच मला सांगण्यात आलं होतं की तुझ्याबद्दल खूप गॉसिप होईल. ते कोणत्याही थराला जाईल. असं असलं तरी तू मात्र शांत रहा. तशी मी शांत आहे. उरला प्रश्न माझ्या लग्नाचा, ते जेव्हा ठरेल तेव्हा मी कळवेन’, असं ती सांगते.
लोकांना बोलू द्या
‘नच बलिये’च्या आठव्या सीझनची ती निवेदक असल्यामुळे अनेक माध्यमांना ती मुलाखती देत सुटलीय. त्यातच तिच्या लग्नाची चर्चाही जोरावर आहे.
Maharashtra Times 4 Apr 2017, 12:39 am