पाकिस्तानी कलाकारांनी अभिनय केलेले चित्रपट भारतात दाखवावेत की नाही यावरून सध्या जोरदार वादावादी सुरू आहे. प्रत्येकजण तावातावाने आपलं मतं मांडतोय. ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी मात्र यावर तिरकस टिप्पणी केली आहे. ‘पाक कलाकार भारतात आले आणि ते आपले पैसे घेऊन सुरक्षितरित्या परत गेले. पण त्यानंतर त्यांचे भोग इथे मात्र भारतीय निर्माते भोगत आहेत’, असं ट्विट त्यांनी केलं आहे. आजवर या सगळ्या चर्चेत परेश रावल कधीच सहभागी झाले नव्हते. पण त्यांचा हा वाग्बाण अगदी मर्मावर बोट ठेवणारा आहे हे खरं. पाक कलाकार भारतात येऊन गेले आणि जाता जाता आमच्या एकजूट असलेल्या सिनेसृष्टीला दुभंगून गेले असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
निर्मात्यांचे भोग
ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी मात्र यावर तिरकस टिप्पणी केली आहे. ‘पाक कलाकार भारतात आले आणि ते आपले पैसे घेऊन सुरक्षितरित्या परत गेले. पण त्यानंतर त्यांचे भोग इथे मात्र भारतीय निर्माते भोगत आहेत’, असं ट्विट त्यांनी केलं आहे.
Maharashtra Times 19 Oct 2016, 12:12 am