सलमान खान आणि 'बिग बॉस' हा बहुचर्चित कार्यक्रम यांचं नातं अधिकाधिक घट्ट होत चाललंय. पण गेल्या काही दिवसांत सलमान या शोच्या निर्मात्यांवर नाराज आहे म्हणे. त्याचं झालं असं, की सलमानने एकदा घरातल्या सगळ्या स्पर्धकांसाठी त्याच्या घरून जेवण बनवून आणलं होतं. ते जेवण घरात सगळ्यांना द्यावं अशी त्याची इच्छा होती. पण ते जेवण घरात पोहोचलंच नाही. सलमानने काही स्पर्धकांना, जेवण आवडलं का? अशी विचारणा केली असता त्यांना काही कळलं नाही. त्यामुळे 'ते' जेवण स्पर्धकांपर्यंत पोहोचलंच नाही हे त्याच्या लक्षात आलं. यावरुन सलमान नाराज असून, बिग बॉसच्या निर्मात्यांकडे तो आपली नाराजी नोंदवणार असल्याचं कळतं. आता या गोष्टीवरुन सल्लूभाईंनी शो सोडला नाही म्हणजे मिळवलं.
सलमान नाराज
सलमान खान आणि 'बिग बॉस' हा बहुचर्चित कार्यक्रम यांचं नातं अधिकाधिक घट्ट होत चाललंय. पण गेल्या काही दिवसांत सलमान या शोच्या निर्मात्यांवर नाराज आहे म्हणे. त्याचं झालं असं, की सलमानने एकदा घरातल्या सगळ्या स्पर्धकांसाठी त्याच्या घरून जेवण बनवून आणलं होतं. ते जेवण घरात सगळ्यांना द्यावं अशी त्याची इच्छा होती.
Maharashtra Times 11 Jan 2017, 12:45 am