'पद्मावती'ला होणार विरोध बघता संजय दत्तनं आगामी 'द गूड महाराजा' या ऐतिहासिक जीवनपटातून काढता पाय घेतल्याची चर्चा आहे. जाम साहिब दिग्विजयसिंगजी रणजितसिंगजी यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. 'भूमी'नंतर संजू बाबासोबत हा सिनेमा करणार असल्याचं उमंग कुमारनं जाहीर केलं होतं. पुढच्या महिन्यापासून शूटिंगलाही सुरुवात होणार होती. मात्र त्याआधीच महाराजांच्या मुलींनी उमंगकुमार यांना एक खरमरीत पत्र लिहिलं. वाढती गुंतागुंत आणि विरोध बघता संजयनं सरळ सिनेमावर पाणी सोडलंय.
वेळीच काढता पाय
पुढच्या महिन्यापासून शूटिंगलाही सुरुवात होणार होती. मात्र त्याआधीच महाराजांच्या मुलींनी उमंगकुमार यांना एक खरमरीत पत्र लिहिलं. वाढती गुंतागुंत आणि विरोध बघता संजयनं सरळ सिनेमावर पाणी सोडलंय.
Maharashtra Times 14 Nov 2017, 12:57 am