अ‍ॅपशहर

अखेर भन्साळी बोलले...

अखेर संजय लीला भन्साळी बोलले. ‘पद्मावती’मुळे गेल्या काही दिवसांपासून बराच वाद होतोय. राजस्थानात या टीमला मारहाण करण्यात आली, तर कोल्हापुरात सिनेमाचा सेट जाळण्यात आला. या पार्श्वभूमीवर भन्साळी काहीच बोलत नव्हते. आता मात्र त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.

Maharashtra Times 30 Mar 2017, 9:02 am
अखेर संजय लीला भन्साळी बोलले. ‘पद्मावती’मुळे गेल्या काही दिवसांपासून बराच वाद होतोय. राजस्थानात या टीमला मारहाण करण्यात आली, तर कोल्हापुरात सिनेमाचा सेट जाळण्यात आला. या पार्श्वभूमीवर भन्साळी काहीच बोलत नव्हते. आता मात्र त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. या सिनेमावर प्रत्येक भारतीयाला गर्व वाटेल, याची ग्वाही त्यांनी दिली आहे. त्याचवेळी राणी पद्मावती आणि अल्लाउद्दीन खिल्जी यांच्यात कोणतंही रोमँटिक दृश्य नसल्याचा खुलासाही त्यांनी केला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करतानाच, त्यासोबत येणाऱ्या जबाबदारीचंही मला भान आहे हेही त्यांनी सूचित केलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज