बॉलिवूड कलाकार सोशल मीडियावर काही ना काही कारणावरुन नेहमी ट्रोल होत असतात. पण हे ट्रोलर्स त्यांना एवढं का बोलतात, या प्रश्नाचं उत्तर अभिनेत्री अदिती राव हैदरीनं दिलं आहे. तिच्या मते ते कुणावरचा तरी राग काढत असतात. ती म्हणाली, की 'या ट्रोलर्सना त्यांच्या खासगी आयुष्यात काहीतरी अडचणी येतात. त्यामुळे वैतागलेल्या या मंडळींना आपला राग कुणावर तरी काढायचा असतो. मग ते सोशल मीडियावर येतात.' तिच्या या म्हणण्यावर ट्रोलर्स काय म्हणतील ते आता बघू.
ते राग काढतात
बॉलिवूड कलाकार सोशल मीडियावर काही ना काही कारणावरुन नेहमी ट्रोल होत असतात...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Nov 2019, 4:00 am