सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचा मोसम चालू आहे. दीपिका-रणवीर, प्रियांका-निक यांच्यापाठोपाठ आता आलिया भट आणि रणबीर कपूरच्या लग्नाबाबतही चर्चा सुरू झाल्या आहेत. अलीकडे ती एका पुरस्कार सोहळ्याला गेली असता तिला लग्नाबाबत विचारण्यात आलं. हा प्रश्न तिनं हसण्यावारी घेतला खरा पण त्याचं गंमतीशीर उत्तरही दिलं. 'माझ्या लग्नाची वाट पाहणाऱ्यांनी आणखी वाट पाहा. कथेचा क्लायमॅक्स हा चांगला आणि आनंदी असला पाहिजे', असं उत्तर आलियानं दिलं.
वाट पाहा!
सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचा मोसम चालू आहे...
Maharashtra Times 21 Nov 2018, 4:00 am