मुंबई:
'हाउ इज द जोश?' असा प्रश्न आता कुणी विचारला तर 'हाय सर!' असं उत्तर आपसुकच दिलं जातं. 'उरी - द सर्जिकल स्ट्राइक' चित्रपटातील हा डायलॉग गल्लीपासून दिल्लीपर्यंत ऐकायला मिळतोय. परंतु, या डायलॉगच्या जन्माची कथा फारच मजेशीर आहे.
'हाउ इज द जोश?' हा डायलॉग नेमका सुचला कसा याबद्दल 'उरी'चा लेखक- दिग्दर्शक आदित्य धर याने धमाल किस्सा सांगितला. या डायलॉगचा संबंध थेट आदित्यच्या बालपणाशी आहे. तो म्हणाला, 'माझ्या काही मित्रांचे वडील सैन्यदलात होते. त्यामुळे आम्ही बऱ्याचदा आर्मी क्लबमध्ये जायचो. दिल्लीत एक जागा होती जिथे आम्ही नेहमी ख्रिसमस आणि न्यू इयरच्या पार्टीसाठी जायचो. तेव्हा तिथे सैन्यदलातील एक निवृत्त अधिकारी यायचे. क्लबमध्ये आलेल्या सगळ्या लहान मुलांना ते आपल्या समोर रांगेत उभे करायचे आणि त्यांच्या हातात एक मोठ्ठं चॉकलेट असायचं. ते आम्हा मुलांना विचारायचे 'हाउ इज द जोश?' आणि मग आम्ही सगळे जोरात ओरडायचो 'हाय सर!' जो मुलगा सगळ्यात मोठ्याने या प्रश्नाचं उत्तर देईल त्याला ते चॉकलेट मिळत असे.'
चित्रपटातील हा डायलॉग इतका हिट होईल हे आदित्यला कधीच वाटले नव्हते. तो सांगतो, 'उरी'ची स्क्रिप्ट लिहिताना मी माझ्या आयुष्यातील हा डायलॉग चित्रपटात वापरणार असं ठरवलं होतं. परंतु, तो इतका सुपरहिट ठरेल याचा मात्र मी कधीच विचार केला नव्हता. माझ्या बालपणीच्या सुंदर आठवणींपैकी असणाऱ्या या वाक्यानं लोकांच्या मनात घर केलं हे मला फार आनंद देणारं आहे.'
'हाउ इज द जोश?' असा प्रश्न आता कुणी विचारला तर 'हाय सर!' असं उत्तर आपसुकच दिलं जातं. 'उरी - द सर्जिकल स्ट्राइक' चित्रपटातील हा डायलॉग गल्लीपासून दिल्लीपर्यंत ऐकायला मिळतोय. परंतु, या डायलॉगच्या जन्माची कथा फारच मजेशीर आहे.
'हाउ इज द जोश?' हा डायलॉग नेमका सुचला कसा याबद्दल 'उरी'चा लेखक- दिग्दर्शक आदित्य धर याने धमाल किस्सा सांगितला. या डायलॉगचा संबंध थेट आदित्यच्या बालपणाशी आहे. तो म्हणाला, 'माझ्या काही मित्रांचे वडील सैन्यदलात होते. त्यामुळे आम्ही बऱ्याचदा आर्मी क्लबमध्ये जायचो. दिल्लीत एक जागा होती जिथे आम्ही नेहमी ख्रिसमस आणि न्यू इयरच्या पार्टीसाठी जायचो. तेव्हा तिथे सैन्यदलातील एक निवृत्त अधिकारी यायचे. क्लबमध्ये आलेल्या सगळ्या लहान मुलांना ते आपल्या समोर रांगेत उभे करायचे आणि त्यांच्या हातात एक मोठ्ठं चॉकलेट असायचं. ते आम्हा मुलांना विचारायचे 'हाउ इज द जोश?' आणि मग आम्ही सगळे जोरात ओरडायचो 'हाय सर!' जो मुलगा सगळ्यात मोठ्याने या प्रश्नाचं उत्तर देईल त्याला ते चॉकलेट मिळत असे.'
चित्रपटातील हा डायलॉग इतका हिट होईल हे आदित्यला कधीच वाटले नव्हते. तो सांगतो, 'उरी'ची स्क्रिप्ट लिहिताना मी माझ्या आयुष्यातील हा डायलॉग चित्रपटात वापरणार असं ठरवलं होतं. परंतु, तो इतका सुपरहिट ठरेल याचा मात्र मी कधीच विचार केला नव्हता. माझ्या बालपणीच्या सुंदर आठवणींपैकी असणाऱ्या या वाक्यानं लोकांच्या मनात घर केलं हे मला फार आनंद देणारं आहे.'