अ‍ॅपशहर

ऋषी कपूर यांना छळतेय ही वेदना

हिंदी सिनेसृष्टीत एक काळ गाजवणारे निर्माते-दिग्दर्शक राज कपूर यांच्या आर. के. बॅनरचा वारसा पुढं नेऊ न शकल्याची खंत त्यांचे चिरंजीव व प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांनी व्यक्त केली आहे. 'अभिनय हे माझं पहिलं प्रेम आहे. या प्रेमामुळं चित्रपट निर्मितीकडं लक्ष देता आलं नाही. त्यामुळं कपूर घराण्याचा आर. के. बॅनर मागं पडला. त्याबद्दल मी गुन्हेगार आहे,' अशी वेदना त्यांनी बोलून दाखवली आहे.

Maharashtra Times 12 Sep 2017, 4:47 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम i can not bring rk banner forward i am guilty rishi kapoor
ऋषी कपूर यांना छळतेय ही वेदना


हिंदी सिनेसृष्टीत एक काळ गाजवणारे निर्माते-दिग्दर्शक राज कपूर यांच्या आर. के. बॅनरचा वारसा पुढं नेऊ न शकल्याची खंत त्यांचे चिरंजीव व प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांनी व्यक्त केली आहे. 'अभिनय हे माझं पहिलं प्रेम आहे. या प्रेमामुळं चित्रपट निर्मितीकडं लक्ष देता आलं नाही. त्यामुळं कपूर घराण्याचा आर. के. बॅनर मागं पडला. त्याबद्दल मी गुन्हेगार आहे,' अशी वेदना त्यांनी बोलून दाखवली आहे.

'पटेल की पंजाबी शादी' या चित्रपटाच्या प्रसिद्धीत व्यग्र असलेल्या ऋषी कपूर यांनी एका मुलाखतीदरम्यान आपल्या मनातील सल बोलून दाखवला. 'सुरुवातीच्या काळात मी चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका करायचो. त्यामुळं बिझी असायचो. नंतर मोकळा वेळ मिळाला तेव्हा 'आ आब लौट चले' हा चित्रपट बनवला. त्यानंतर मात्र संधी मिळाली नाही. मला सतत चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. अभिनय ही माझी आवड असल्यानं मी त्या नाकारू शकलो नाही. त्यातून आर. के. बॅनरकडं दुर्लक्ष झालं. घरातल्या इतर लोकांनीही चित्रपट निर्मितीचा प्रयत्न केला नाही. रणबीरसारखा अभिनेता, करिनासारखी अभिनेत्री आणि चरित्र भूमिकेसाठी अनेक कलाकार घरात असतानाही आम्हाला ते जमलं नाही,' असं ते म्हणाले.

'तो काळ वेगळा होता. आम्हीच काय रमेश सिप्पी, सुभाष घई यांच्यासारख्या लोकांनीही चित्रपट बनवले नाहीत. त्यामुळंही आर. के. बॅनर मागे पडला असावा,' असं ऋषी कपूर म्हणाले. 'आतातर आम्ही चित्रपट बनवायलाच घाबरतो. कारण, चित्रपट बनवण्यासाठी कोट्यवधी रुपये गुंतवावे लागतात. आम्ही दुसऱ्याकडून पैसे घेऊन चित्रपट बनवत नाही. स्वत:कडचंच सगळं खर्चून आम्ही चित्रपट बनवतो. अशा परिस्थितीत थोडी कुठे उणीव राहिली तर सगळंच मुसळ केरात जाईल. आमचे चित्रपट आवडणारा प्रेक्षक कमी झाला आहे. हल्ली लोक खराब चित्रपट पाहून भारावून जातात आणि खराब चित्रपटांना हिट बनवतात. त्यामुळं नेमकं बनवायचं काय हेच मला समजत नाही,' असं ऋषी कपूर म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज