'कारण आपलं तर ठरलंय....' असं म्हणत 'सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमामधून अभिनेत्री स्पृहा जोशी प्रेक्षकांना आपलंसं करून टाकते. कवयित्री, लेखिका, गीतकार, अभिनेत्री आणि सूत्रसंचालक अशा वेगवेगळ्या भूमिका करणारी स्पृहा मात्र अजूनही चांगल्या संहितेच्या प्रतीक्षेत आहे. फॅशन, काही प्रेक्षकांचा दृष्टिकोन, कामांची निवड या सगळयाबाबत तिने मुंटाशी गप्पा मारल्या.
० 'सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाचं कौतुक होतंय...कसं वाटतंय?
- मी रिअॅलिटी शोचं अँकरिंग याआधी कधी केलं नव्हतं. त्यामुळे कसं होईल याबाबत कुतूहल होतं. पण दिग्दर्शक, परीक्षक, स्पर्धक, तंत्रज्ञांची टीम या सगळ्यामुळे मला कधीच दडपण आलं नाही. ज्या सेटवर तुम्हाला जावंसं वाटतं ते काम चांगलंच होतं यावर माझा विश्वास आहे. माझं काम चांगलं होण्यामागे या सगळ्या गोष्टी आहेत.
० सिनेमांमध्ये ठरावीक काळानंतर दिसतेस. यामागे काही विशिष्ट कारण?
- आतापर्यंत केलेल्या कामाबद्दल मी खुश आहे. पण सध्या माझ्याकडे येणाऱ्या संहितांबद्दल मी फारशी खुश नाही. याचं कारण जाणून घेण्यासाठी मी त्याच्या खोलात गेले नाही. पण त्याचं वाईट जरूर वाटतं. जे काम येतंय ते करावसं वाटत नाही आणि चांगलं काम येत नाही ही वस्तुस्थिती आहे. पण मी आगामी 'विक्की वेलिंगकर' या सिनेमात एका वेगळ्या भूमिकेतून दिसणार आहे. पण त्याविषयी मला आता फार काही बोलता येणार नाही.
० नाटकांमधून ठरवून ब्रेक घेतलास का?
-हो, ठरवून थांबले. सलग पाच वर्षं मी सातत्याने नाटक करत होते. त्या पाच वर्षांत दर शुक्रवार, शनिवार आणि रविवार मी प्रयोग करत होते. तसंच कामात एकसुरीपणा आलाय असंही मला वाटू लागलं. त्यामुळे एक ब्रेक गरजेचा होता. दीड-दोन वर्षांनी नव्या ऊर्जेने नवीन नाटक करायला मी तयार आहे.
० हिंदी सिनेमा आणि वेब सीरिजमध्येही तू दिसणार आहेस?
- हो, खरंय. सिनेमांबद्दल मी इतक्यात काही सांगू शकणार नाही. त्यातल्या माझ्या भूमिका चांगल्या असून त्यातून मला खूप शिकायला मिळालंय; इतकंच आता सांगता येईल. 'रंगबाज' या हिंदी वेब सीरिजमध्ये काम केलंय. ही सीरिज पुढच्या महिन्यात प्रदर्शित होतेय.
० कलाकारांकडे बघण्याच्या दृष्टिकोनाबद्दल तू तुझं परखड मत मांडलं होतंस. त्याबद्दल तुला आजही तसंच वाटतं?
- एखाद्याविषयी तोंडावर आपण काही बोलू शकत नाही आणि सोशल मीडियावर बोललो तर आपला गळा धरणारं कोणी नाही; त्यामुळे तिथल्या बोलण्याला निर्बंध नसतात. कलाकार म्हणून मी काय केलं पाहिजे, कोणत्या भूमिका केल्या पाहिजेत हा सर्वस्वी माझा निर्णय असेल; ते तुम्ही ठरवू शकत नाही. या सगळ्या पलीकडे बॉडी शेमिंग हा प्रकार तर आपल्याकडे पूर्वीपासून आहेच. काही प्रेक्षकांना तर असं वाटतं, 'आम्ही तुमचं कौतुक करतो ना मग आम्हाला हवं तेसुद्धा आम्ही बोलणारच'. हा अटीट्यूड येतो कुठून? सोशल मीडियाला माझा विरोध नाही. त्यावर ज्या पद्धतीने बोललं जातं त्याला माझा विरोध आहे.
० तुझ्या फॅशनची आता चर्चा होते. पूर्वी स्पृहा अशी नव्हती. हा बदल ठरवून केलास का?
- स्वत:ला उत्तमरित्या सादर करणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे दिसण्याबाबत कलाकार जागरूक झाले आहेत. आपणही त्याचा विचार का करू नये असं एका क्षणी वाटू लागलं आणि मी बदलायचं ठरवलं. आपण घालत असलेल्या कपड्यांमध्ये आपल्याला सहज वावरता आलं पाहिजे. त्याविषयी चांगलं वाटलं पाहिजे. माझं हेच म्हणणं लक्षात घेऊन माझे स्टायलिस्ट कपडे डिझाइन करत असतात. आम्ही वेगवेगळे प्रयोग करत असतो. माझ्या फॅशनची चर्चा होते याचा मला आनंद आहे.
० 'सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाचं कौतुक होतंय...कसं वाटतंय?
- मी रिअॅलिटी शोचं अँकरिंग याआधी कधी केलं नव्हतं. त्यामुळे कसं होईल याबाबत कुतूहल होतं. पण दिग्दर्शक, परीक्षक, स्पर्धक, तंत्रज्ञांची टीम या सगळ्यामुळे मला कधीच दडपण आलं नाही. ज्या सेटवर तुम्हाला जावंसं वाटतं ते काम चांगलंच होतं यावर माझा विश्वास आहे. माझं काम चांगलं होण्यामागे या सगळ्या गोष्टी आहेत.
० सिनेमांमध्ये ठरावीक काळानंतर दिसतेस. यामागे काही विशिष्ट कारण?
- आतापर्यंत केलेल्या कामाबद्दल मी खुश आहे. पण सध्या माझ्याकडे येणाऱ्या संहितांबद्दल मी फारशी खुश नाही. याचं कारण जाणून घेण्यासाठी मी त्याच्या खोलात गेले नाही. पण त्याचं वाईट जरूर वाटतं. जे काम येतंय ते करावसं वाटत नाही आणि चांगलं काम येत नाही ही वस्तुस्थिती आहे. पण मी आगामी 'विक्की वेलिंगकर' या सिनेमात एका वेगळ्या भूमिकेतून दिसणार आहे. पण त्याविषयी मला आता फार काही बोलता येणार नाही.
० नाटकांमधून ठरवून ब्रेक घेतलास का?
-हो, ठरवून थांबले. सलग पाच वर्षं मी सातत्याने नाटक करत होते. त्या पाच वर्षांत दर शुक्रवार, शनिवार आणि रविवार मी प्रयोग करत होते. तसंच कामात एकसुरीपणा आलाय असंही मला वाटू लागलं. त्यामुळे एक ब्रेक गरजेचा होता. दीड-दोन वर्षांनी नव्या ऊर्जेने नवीन नाटक करायला मी तयार आहे.
० हिंदी सिनेमा आणि वेब सीरिजमध्येही तू दिसणार आहेस?
- हो, खरंय. सिनेमांबद्दल मी इतक्यात काही सांगू शकणार नाही. त्यातल्या माझ्या भूमिका चांगल्या असून त्यातून मला खूप शिकायला मिळालंय; इतकंच आता सांगता येईल. 'रंगबाज' या हिंदी वेब सीरिजमध्ये काम केलंय. ही सीरिज पुढच्या महिन्यात प्रदर्शित होतेय.
० कलाकारांकडे बघण्याच्या दृष्टिकोनाबद्दल तू तुझं परखड मत मांडलं होतंस. त्याबद्दल तुला आजही तसंच वाटतं?
- एखाद्याविषयी तोंडावर आपण काही बोलू शकत नाही आणि सोशल मीडियावर बोललो तर आपला गळा धरणारं कोणी नाही; त्यामुळे तिथल्या बोलण्याला निर्बंध नसतात. कलाकार म्हणून मी काय केलं पाहिजे, कोणत्या भूमिका केल्या पाहिजेत हा सर्वस्वी माझा निर्णय असेल; ते तुम्ही ठरवू शकत नाही. या सगळ्या पलीकडे बॉडी शेमिंग हा प्रकार तर आपल्याकडे पूर्वीपासून आहेच. काही प्रेक्षकांना तर असं वाटतं, 'आम्ही तुमचं कौतुक करतो ना मग आम्हाला हवं तेसुद्धा आम्ही बोलणारच'. हा अटीट्यूड येतो कुठून? सोशल मीडियाला माझा विरोध नाही. त्यावर ज्या पद्धतीने बोललं जातं त्याला माझा विरोध आहे.
० तुझ्या फॅशनची आता चर्चा होते. पूर्वी स्पृहा अशी नव्हती. हा बदल ठरवून केलास का?
- स्वत:ला उत्तमरित्या सादर करणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे दिसण्याबाबत कलाकार जागरूक झाले आहेत. आपणही त्याचा विचार का करू नये असं एका क्षणी वाटू लागलं आणि मी बदलायचं ठरवलं. आपण घालत असलेल्या कपड्यांमध्ये आपल्याला सहज वावरता आलं पाहिजे. त्याविषयी चांगलं वाटलं पाहिजे. माझं हेच म्हणणं लक्षात घेऊन माझे स्टायलिस्ट कपडे डिझाइन करत असतात. आम्ही वेगवेगळे प्रयोग करत असतो. माझ्या फॅशनची चर्चा होते याचा मला आनंद आहे.