अ‍ॅपशहर

'आक्षेप कुणाला? शिव्यांना की महिलांनी शिव्या देण्याला?'

'गँग्ज ऑफ वासेपूर' या चित्रपटातही शिव्यांची रेलचेल आहे. पण तिथं पुरुष शिव्या देताना दिसतात. 'वीरे दी वेडिंग'मध्ये महिला शिव्या देतेय म्हणून आक्षेप घेतला जातोय. म्हणजे तुमचा नेमका आक्षेप कशाला आहे? शिव्या देण्याला आहे की महिलांनी शिव्या देण्याला आहे?,' असा रोकडा सवाल अभिनेत्री स्वरा भास्कर हिनं विचारला आहे.

उपमा सिंह | नवभारत टाइम्स 30 May 2018, 1:22 pm
उपमा सिंह
महाराष्ट्र टाइम्स.कॉम swara-bhaskar


'गँग्ज ऑफ वासेपूर' या चित्रपटातही शिव्यांची रेलचेल आहे. पण तिथं पुरुष शिव्या देताना दिसतात. 'वीरे दी वेडिंग'मध्ये महिला शिव्या देतेय म्हणून आक्षेप घेतला जातोय. म्हणजे तुमचा नेमका आक्षेप कशाला आहे? शिव्या देण्याला आहे की महिलांनी शिव्या देण्याला आहे?,' असा रोकडा सवाल अभिनेत्री स्वरा भास्कर हिनं विचारला आहे.

स्वरा भास्कर हिची भूमिका असलेला 'वीरे दी वेडिंग' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. चार तरुणींच्या जीवनावर बेतलेल्या या चित्रपटात जवळच्या मैत्रिणींमध्ये सहज होणारे संवाद आहेत. शिव्या आणि सेक्सची चर्चा आहे. या शिव्यांना आक्षेप घेत चित्रपटावर बहिष्कार घालण्याचं आवाहन काही संघटनांनी केलंय. 'नवभारत टाइम्स'ला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत स्वरा भास्कर हिनं या साऱ्याला सडेतोड उत्तर दिलंय.

'दारू पिणं, शिव्या देणं ही पुरुषांची मक्तेदारी आहे का?', असा प्रश्न तिनं केलाय. 'दारू पिणं, शिवीगाळ करणं या वाईट गोष्टी नाहीत. त्यापेक्षाही कितीतरी वाईट गोष्टी आपल्या समाजात आहेत. मांसाहारावरून लोकांना मारणं, जिवंत जाळणं, जागेच्या नावाखाली (जुनैदचा उल्लेख करून) १५ वर्षीय मुलाला मारून टाकणं. या सगळ्या घटना वाईटच आहेत. त्यामुळं योग्य काय आणि अयोग्य काय हे आपण आधी ठरवलं पाहिजे,' असं ती म्हणाली.

'सार्वजनिक ठिकाणी, वडिलधाऱ्या माणसांपुढं शिव्या देणं चुकीचंच आहे. परंतु आपले नेते हमखास तसं करताना दिसतात. जाहीर सभांमध्ये रामजादे विरुद्ध xxxजादेचा वाद उभा करणं हे कशाचं द्योतक आहे,' अशी विचारणाही तिनं केली. स्वरा भास्करनं सध्याच्या सरकारवरही निशाणा साधला. 'सध्याचं सरकार सत्तेत आल्यापासून आपला समाज हा बेदरकार, अस्वस्थ आणि द्वेषमूलक बनत चाललाय.'वसुधैव कुटुंबकम्' ही आपल्या समाजाची ओळख नष्ट होत चाललीय. आपल्यापेक्षा वेगळे विचार मांडणाऱ्यांचं तोंड बंद केलं जात आहे. आम्हाला होणारा विरोध याच मानसिकतेतून होत आहे,' असा आरोप तिनं केला.
लेखकाबद्दल
उपमा सिंह
पत्रकारिता में 17 साल का अनुभव। अमर उजाला लखनऊ और दैनिक भास्कर लुधियाना से अनुभव बटोरते-बांटते नवभारत टाइम्स पहुंचीं। फिलहाल एनबीटी मुंबई में असिस्टेंट एडिटर के पद पर कार्यरत हैं। सिनेमा प्यार, पैशन और प्रफेशन तीनों है, तो सिनेमा और सिनेमाई हस्तियों से जुड़े विषयों पर गहरी पकड़ रखती हैं। वहीं, जेंडर इक्वॉलिटी और महिला मुद्दों पर भी धारदार कलम चलाती हैं। इसके लिए उन्हें लाडली मीडिया अवॉर्ड फॉर जेंडर सेंसिबिलिटी से भी सम्मानित किया गया है।... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज