अ‍ॅपशहर

काम मिळत राहाणं महत्त्वाचं

पुणे टाइम्स टीमअभिनेते अनिल कपूर सध्या 'फन्ने खां' या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे आणि त्यादरम्यान होणाऱ्या मुलाखतींमध्ये त्यांना ...

Maharashtra Times 27 Jul 2018, 4:00 am

पुणे टाइम्स टीम

अभिनेते अनिल कपूर सध्या 'फन्ने खां' या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे आणि त्यादरम्यान होणाऱ्या मुलाखतींमध्ये त्यांना मुलांवरूनच जास्त प्रश्न विचारले जात आहेत. मुली सोनम आणि रियाच्या तुलनेत मुलगा हर्षवर्धनचं करिअर अजून डळमळीतच आहे त्याबद्दल काय वाटतं, असं त्यांना नुकतंच विचारण्यात आलं.

त्यावर अनिल कपूर म्हणाले, 'सावरिया आणि दिल्ली ६ हे सोनमचे पहिले दोन सिनेमे असेच अपयशी झाले होते. तेव्हाही लोकांनी मला असेच प्रश्न विचारले होते. मला स्वतःलाही कित्येकवेळा अपयशचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे मला त्याच्या करिअरची इतकी चिंता वाटत नाही. जे नशीबाला मंजूर असेल ते होईल. करिअरच्या सुरुवातीला दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात, एक म्हणजे तुम्ही पडद्यावर कसे दिसता, स्वतःला कसं सादर करता हे महत्त्वाचं असतं आणि दुसरं म्हणजे काम मिळत राहणं आवश्यक असतं. बाकी कोणत्याच गोष्टी तितक्याशा महत्त्वाच्या नसतात.' अनिल कपूर 'फन्ने खां' या सिनेमातून एका वेगळ्याच भूमिकेतून समोर येणार आहेत. आपल्या मुलीचं मोठी गायिका होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वाट्टेल ते करायची तयारी असलेला टॅक्सीचालक त्यांनी या सिनेमात साकारला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज