मुंबई:
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, ज्येष्ठ नाटककार आणि साहित्यिक गिरीश कर्नाड यांचे सोमवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्तानं साहित्य, नाट्य, सिनेसृष्टीवर शोककळा पसरलीय. कर्नाड यांच्या जाण्यानं सामाजिक, राजकीय आणि सिनेनाट्य सृष्टीतील अनेक कलाकारांनी हळहळ तर व्यक्त केली शिवाय त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
भारतीय सांस्कृतिक घडामोडीतील एक अतिशय विद्वान माणूस. भारतीय रंगभूमीवर त्यांनी दिलेले योगदान अनन्यसाधारण आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अत्यंत मोठा पुरस्कर्ता म्हणून गिरीश कर्नाड यांच्याकडे पाहायला हवे. - डॉ जब्बार पटेल, ज्येष्ठ दिग्दर्शक
मी त्यांना दादा म्हणायचे...माझ्या लहानपणापासून ते माझे हिरो होते. त्यांनी लिहिलेलं 'ययाति' हे माझं पहिलं नाटक होतं. या नाटकाचे लेखन गिरीश कर्नाड यांनी केलंय केवळ या एका कारणासाठी माझ्या आई- वडिलांनी मला त्या नाटकात काम करण्यासाठी होकार दिला. ते कुठेही कधीही भेटले तर अगदी प्रेमानं समोरच्या माणसाची विचारपूस करायचे. गिरीश कर्नाड गेले हा माझ्यासाठी फार मोठा धक्का आहे. कार्नाड माझ्या आणि नाट्य-साहित्यक्षेत्रातील प्रत्येकाच्या आठवणीत कायम जिवंत राहतील. - चित्रा पालेकर, ज्येष्ठ अभिनेत्री- लेखिका
गिरीश कर्नाड हा भारतीय रंगभूमीचा आवाज होता. भारतीय नाटकांना चेहरा देण्याचा ज्या नाटककारांचा ठळक प्रयत्न होता त्यापैकी कर्नाड प्रमुख होते. त्यांच्या पहिल्या नाटकापासून त्यांनी सतत भारतीय राजकारण, समाज व्यवस्था, जातीव्यवस्था, धर्म व्यवस्था यांच्यावर भाष्य केलंय आणि हे भाष्य करताना त्यांनी सतत उदारमतवाद, समानता या तत्त्वांचा नेहमीच पुरस्कार केला. या तत्त्वांसाठी लढण्यासाठी ते रस्त्यावरदेखील उतरले. लेखक जे लिहितो ते प्रत्यक्ष कृतीत आणतो असं फार कमी घडतं पण ज्यांनी या दोन्ही गोष्टी साधल्या आणि आपला आदर्श पुढच्या पिढ्यांना घालून दिला त्यात गिरीश कर्नाड होते. - जयंत पवार, नाटककार- नाट्यसमीक्षक
गिरीश एफटीआयआयचे संचालक म्हणून काम पाहत होते तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. त्यांचं जाणं धक्कादायक आहे. भारतीय रंगमंचाला आधुनिक रूप देणारा आणखी एक दिग्गज कलाकार आपण गमावलाय. गिरीश हे एक अतिशय पारदर्शक व्यक्तिमत्व होतं. तरुण लेखकांसाठी ते नेहमीच मदतीचा हात पुढे करत. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. - सतीश आळेकर, नाटककार
माझे आदर्श...गिरीश काका गेल्यानं मला धक्का बसलाय. माझा पहिला चित्रपट 'चेलुवी' मला तुम्ही दिला या गोष्टीसाठी मी कायम तुमची ऋणी राहीन. तुम्ही माझ्यावर जे संस्कार केले, मला प्रेम दिलं त्या सगळ्यासमोर धन्यवाद हा शब्द फारच छोटा आहे. तुम्ही रूजवलेली मूल्य कायम माझ्या सोबत असतील.
सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री
व्रतस्थ रंगकर्मीला श्रध्दा पूर्वक वंदन- नाना पाटेकर, ज्येष्ठ अभिनेते
गिरीश कर्नाड यांचे कार्य येणाऱ्या अनेक पिढ्यांच्या कायम स्मरणात राहील. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
गिरीश कर्नाड यांच्या निधनानं आपण भारतीय चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील एक उत्तम व्यक्तिमत्त्व गमावलंय. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, ज्येष्ठ नाटककार आणि साहित्यिक गिरीश कर्नाड यांचे सोमवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्तानं साहित्य, नाट्य, सिनेसृष्टीवर शोककळा पसरलीय. कर्नाड यांच्या जाण्यानं सामाजिक, राजकीय आणि सिनेनाट्य सृष्टीतील अनेक कलाकारांनी हळहळ तर व्यक्त केली शिवाय त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
भारतीय सांस्कृतिक घडामोडीतील एक अतिशय विद्वान माणूस. भारतीय रंगभूमीवर त्यांनी दिलेले योगदान अनन्यसाधारण आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अत्यंत मोठा पुरस्कर्ता म्हणून गिरीश कर्नाड यांच्याकडे पाहायला हवे. - डॉ जब्बार पटेल, ज्येष्ठ दिग्दर्शक
मी त्यांना दादा म्हणायचे...माझ्या लहानपणापासून ते माझे हिरो होते. त्यांनी लिहिलेलं 'ययाति' हे माझं पहिलं नाटक होतं. या नाटकाचे लेखन गिरीश कर्नाड यांनी केलंय केवळ या एका कारणासाठी माझ्या आई- वडिलांनी मला त्या नाटकात काम करण्यासाठी होकार दिला. ते कुठेही कधीही भेटले तर अगदी प्रेमानं समोरच्या माणसाची विचारपूस करायचे. गिरीश कर्नाड गेले हा माझ्यासाठी फार मोठा धक्का आहे. कार्नाड माझ्या आणि नाट्य-साहित्यक्षेत्रातील प्रत्येकाच्या आठवणीत कायम जिवंत राहतील. - चित्रा पालेकर, ज्येष्ठ अभिनेत्री- लेखिका
गिरीश कर्नाड हा भारतीय रंगभूमीचा आवाज होता. भारतीय नाटकांना चेहरा देण्याचा ज्या नाटककारांचा ठळक प्रयत्न होता त्यापैकी कर्नाड प्रमुख होते. त्यांच्या पहिल्या नाटकापासून त्यांनी सतत भारतीय राजकारण, समाज व्यवस्था, जातीव्यवस्था, धर्म व्यवस्था यांच्यावर भाष्य केलंय आणि हे भाष्य करताना त्यांनी सतत उदारमतवाद, समानता या तत्त्वांचा नेहमीच पुरस्कार केला. या तत्त्वांसाठी लढण्यासाठी ते रस्त्यावरदेखील उतरले. लेखक जे लिहितो ते प्रत्यक्ष कृतीत आणतो असं फार कमी घडतं पण ज्यांनी या दोन्ही गोष्टी साधल्या आणि आपला आदर्श पुढच्या पिढ्यांना घालून दिला त्यात गिरीश कर्नाड होते. - जयंत पवार, नाटककार- नाट्यसमीक्षक
गिरीश एफटीआयआयचे संचालक म्हणून काम पाहत होते तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. त्यांचं जाणं धक्कादायक आहे. भारतीय रंगमंचाला आधुनिक रूप देणारा आणखी एक दिग्गज कलाकार आपण गमावलाय. गिरीश हे एक अतिशय पारदर्शक व्यक्तिमत्व होतं. तरुण लेखकांसाठी ते नेहमीच मदतीचा हात पुढे करत. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. - सतीश आळेकर, नाटककार
माझे आदर्श...गिरीश काका गेल्यानं मला धक्का बसलाय. माझा पहिला चित्रपट 'चेलुवी' मला तुम्ही दिला या गोष्टीसाठी मी कायम तुमची ऋणी राहीन. तुम्ही माझ्यावर जे संस्कार केले, मला प्रेम दिलं त्या सगळ्यासमोर धन्यवाद हा शब्द फारच छोटा आहे. तुम्ही रूजवलेली मूल्य कायम माझ्या सोबत असतील.
सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री
व्रतस्थ रंगकर्मीला श्रध्दा पूर्वक वंदन- नाना पाटेकर, ज्येष्ठ अभिनेते
गिरीश कर्नाड यांचे कार्य येणाऱ्या अनेक पिढ्यांच्या कायम स्मरणात राहील. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
गिरीश कर्नाड यांच्या निधनानं आपण भारतीय चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील एक उत्तम व्यक्तिमत्त्व गमावलंय. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री