मुंबईः
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सोशल मीडियावर 'मे भी चौकीदार' हे नवं अभियान राबवण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटर हँडलवरील नावात बदल करून चौकीदार नरेंद्र मोदी असं केलं आहे. त्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांचं अनुकरण केलं आहे. मी टू प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या एम. जे. अकबर यांनी देखील 'मै भी चौकीदार' या अभियानाला पांठिबा दिला आहे. मात्र अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी अकबर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'तुम्ही जर चौकीदार असाल तर देशातील महिला असुरक्षितचं' असा टोला त्यांनी लगावला आहे.
एम. जे. अकबर यांनी 'मै भी चौकीदार' या अभियानाला पांठिबा देताना 'या अभियानाचा मी एक हिस्सा आहे याचा मला अभिमान आहे. देशातील नागरिक म्हणून भ्रष्टाचार, अस्वच्छता, गरिबी आणि दहशतवाद संपवण्यासाठी व समृद्ध आणि सुरक्षित देश बनवण्यासाठी मी पूर्ण सहकार्य करेन असं ट्वीट केलं आहे. या ट्विटला प्रतिउत्तर देताना रेणुका शहाणे यांनी 'जर तुम्ही चौकीदार असाल तर देशातील कोणतीच महिला सुरक्षित नाही.' असा टोला लगावला आहे.
मी टू मोहिमेंतर्गत एम. जे. अकबर यांच्यावर ९ महिलांनी लैंगिक शोषण केल्याचे आरोप केले होते. त्यानंतर त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सोशल मीडियावर 'मे भी चौकीदार' हे नवं अभियान राबवण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटर हँडलवरील नावात बदल करून चौकीदार नरेंद्र मोदी असं केलं आहे. त्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांचं अनुकरण केलं आहे. मी टू प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या एम. जे. अकबर यांनी देखील 'मै भी चौकीदार' या अभियानाला पांठिबा दिला आहे. मात्र अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी अकबर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'तुम्ही जर चौकीदार असाल तर देशातील महिला असुरक्षितचं' असा टोला त्यांनी लगावला आहे.
एम. जे. अकबर यांनी 'मै भी चौकीदार' या अभियानाला पांठिबा देताना 'या अभियानाचा मी एक हिस्सा आहे याचा मला अभिमान आहे. देशातील नागरिक म्हणून भ्रष्टाचार, अस्वच्छता, गरिबी आणि दहशतवाद संपवण्यासाठी व समृद्ध आणि सुरक्षित देश बनवण्यासाठी मी पूर्ण सहकार्य करेन असं ट्वीट केलं आहे. या ट्विटला प्रतिउत्तर देताना रेणुका शहाणे यांनी 'जर तुम्ही चौकीदार असाल तर देशातील कोणतीच महिला सुरक्षित नाही.' असा टोला लगावला आहे.
मी टू मोहिमेंतर्गत एम. जे. अकबर यांच्यावर ९ महिलांनी लैंगिक शोषण केल्याचे आरोप केले होते. त्यानंतर त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.