जगभरात सध्या भारताचं नाव चर्चेत आहे. जगातील ९५ टक्के व्यापाराचा मार्ग हा भारताशी निगडीत समुद्रातूनच जातो. त्यामुळे भारताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळेच सागरी सुरक्षा हा विषय आपल्या देशासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. म्हणूनच ३३ युद्धनौकांची बांधणी आपल्या देशात केली जातेय. सागरी सुरक्षा हा आपल्यासाठी नेहमीच महत्त्वाचा विषय आहे. अगदी शिवरायांनी देखील त्यासाठी आरमारावर विशेष लक्ष दिलं होतं. त्यामुळे युद्धनौकांची ही बांधणी आपल्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतेय. या कामामुळे देशात रोजगारही निर्माण होतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या युद्धनौका अतिशय अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे भारतात तयार होणार आहेत. त्यामुळे देशाच्या शत्रूंच्या मनात आपल्याविषयी दरारा निर्माण होईल. मयूर चिंकाटे, पाटकर-वर्दे कॉलेज
सागरी सुरक्षा महत्त्वाची
जगभरात सध्या भारताचं नाव चर्चेत आहे जगातील ९५ टक्के व्यापाराचा मार्ग हा भारताशी निगडीत समुद्रातूनच जातो त्यामुळे भारताला अनन्यसाधारण महत्त्व आहे...
MT 22 Apr 2019, 4:00 am