मुंबई:
हिंदी सिनेसृष्टी ढवळून काढणाऱ्या #MeToo मोहिमेला सुप्रसिद्ध पटकथा लेखक सलीम खान यांनी ठाम पाठिंबा दर्शवला असून या मोहिमेची खिल्ली उडवणाऱ्यांना फटकारले आहे. 'सत्य कायमचे लपून राहण्यापेक्षा उशिरा का होईना बाहेर आले ते बरेच झाले. पीडित महिलांनी आता फलनिष्पत्तीची वाट पाहण्याची गरज नाही. त्यांना लोकांनी पूर्ण पाठिंबा दिला आहे,' असं सलीम खान यांनी म्हटलं आहे.
#MeToo मोहीम सुरू झाल्यापासून बॉलिवूडसह अनेक क्षेत्रात दोन तट पडले आहेत. काहींनी या मोहिमेला पाठिंबा दिला आहे. तर, 'काहींनी इतकी वर्षे का गप्प बसलात?' असं म्हणत या मोहिमेची खिल्ली उडवली आहे. सलीम खान यांनी ट्विटरच्या माध्यमातून या लोकांना झापलं आहे. 'आरोपी आणि त्यांच्या समर्थकांकडे केवळ एकच पळवाट आहे ती म्हणजे, आरोप करायला इतका उशीर का?, पण पीडितांनी या युक्तिवादांनी विचलित होऊ नये. लोकांचा मोठा पाठिंबा त्यांना मिळत आहे,' असं खान यांनी म्हटलं आहे. 'पर्वतावरून पडलेला माणूस एखाद्या वेळेस उभा राहू शकतो, पण स्वत:च्या नजरेतून उतरलेला माणूस कधीही उभा राहू शकत नाही,' हेही त्यांनी निदर्शनास आणून दिलं आहे.
हिंदी सिनेसृष्टी ढवळून काढणाऱ्या #MeToo मोहिमेला सुप्रसिद्ध पटकथा लेखक सलीम खान यांनी ठाम पाठिंबा दर्शवला असून या मोहिमेची खिल्ली उडवणाऱ्यांना फटकारले आहे. 'सत्य कायमचे लपून राहण्यापेक्षा उशिरा का होईना बाहेर आले ते बरेच झाले. पीडित महिलांनी आता फलनिष्पत्तीची वाट पाहण्याची गरज नाही. त्यांना लोकांनी पूर्ण पाठिंबा दिला आहे,' असं सलीम खान यांनी म्हटलं आहे.
#MeToo मोहीम सुरू झाल्यापासून बॉलिवूडसह अनेक क्षेत्रात दोन तट पडले आहेत. काहींनी या मोहिमेला पाठिंबा दिला आहे. तर, 'काहींनी इतकी वर्षे का गप्प बसलात?' असं म्हणत या मोहिमेची खिल्ली उडवली आहे. सलीम खान यांनी ट्विटरच्या माध्यमातून या लोकांना झापलं आहे. 'आरोपी आणि त्यांच्या समर्थकांकडे केवळ एकच पळवाट आहे ती म्हणजे, आरोप करायला इतका उशीर का?, पण पीडितांनी या युक्तिवादांनी विचलित होऊ नये. लोकांचा मोठा पाठिंबा त्यांना मिळत आहे,' असं खान यांनी म्हटलं आहे. 'पर्वतावरून पडलेला माणूस एखाद्या वेळेस उभा राहू शकतो, पण स्वत:च्या नजरेतून उतरलेला माणूस कधीही उभा राहू शकत नाही,' हेही त्यांनी निदर्शनास आणून दिलं आहे.