मुंबई:
बॉलिवूडचे 'बाजीराव-मस्तानी' अर्थात, रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोन येत्या २० नोव्हेंबरला लग्न बंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. रणवीर-दीपिकाला त्यांच्या लग्नाचा कोणताही गाजावाजा करायचा नसून अत्यंत खासगी पद्धतीनं लग्न सोहळा पार पडावा, अशी त्यांची इच्छा आहे. म्हणूनच त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याचं समजतंय. लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांना मोबाइल न वापरण्याची विनंती त्यांनी केल्याचं समजतं.
सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या लग्नातील बरेचसे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आपल्या बाबतीतही असं होऊ नये, अशी 'दीपवीर'ची इच्छा आहे. त्यामुळंच विवाह सोहळ्यासाठी त्यांनी अत्यंत जवळच्या निवडक लोकांनाच आमंत्रित केलंय. तरीही लग्नातील फोटो व्हायरल होण्याची भीती दोघांना सतावते आहे. त्यामुळंच त्यांनी मोबाइलबंदीची शक्कल लढवल्याचं सांगितलं जातंय.
बॉलिवूडचे 'बाजीराव-मस्तानी' अर्थात, रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोन येत्या २० नोव्हेंबरला लग्न बंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. रणवीर-दीपिकाला त्यांच्या लग्नाचा कोणताही गाजावाजा करायचा नसून अत्यंत खासगी पद्धतीनं लग्न सोहळा पार पडावा, अशी त्यांची इच्छा आहे. म्हणूनच त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याचं समजतंय. लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांना मोबाइल न वापरण्याची विनंती त्यांनी केल्याचं समजतं.
सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या लग्नातील बरेचसे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आपल्या बाबतीतही असं होऊ नये, अशी 'दीपवीर'ची इच्छा आहे. त्यामुळंच विवाह सोहळ्यासाठी त्यांनी अत्यंत जवळच्या निवडक लोकांनाच आमंत्रित केलंय. तरीही लग्नातील फोटो व्हायरल होण्याची भीती दोघांना सतावते आहे. त्यामुळंच त्यांनी मोबाइलबंदीची शक्कल लढवल्याचं सांगितलं जातंय.