मुंबई: मॉब लिंचिंगच्या मुद्द्यावर परखडपणे आपले मत मांडणारे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी पहलू खान झुंडबळी प्रकरणी कोणतंही भाष्य करायला नकार दिला. पहलू खान प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर शहा यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, 'मला पहलू खान प्रकरणावर आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवल्याबद्दल काहीही म्हणायचं नाही' असे ते म्हणाले. सामाजिक तसेच राजकीय मुद्द्यांवर निडरपणे आपलं मतप्रदर्शन करणारे शहा यांनी या दोन प्रकरणांवर प्रतिक्रिया देणं का टाळलं असावं, याबद्दल वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.
देशभरात गाजलेल्या राजस्थानमधील पहलू खान झुंडबळी प्रकरणातील सर्व सहा आरोपींची अलवर जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. हा निर्णय सर्व जनतेसाठी धक्कादायक होता. काल झालेल्या एका मुलाखतीत या निर्णयावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास शहा यांनी नकार दिला. 'मला याविषयी काहीही माहिती नाही आणि याबाबतीत म्हणण्यासारखं माझ्याकडे काहीही नाही. काश्मीर प्रश्नावरही मला काहीही म्हणायचं नाही' असं ते म्हणाले.
देशभरात गाजलेल्या राजस्थानमधील पहलू खान झुंडबळी प्रकरणातील सर्व सहा आरोपींची अलवर जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. हा निर्णय सर्व जनतेसाठी धक्कादायक होता. काल झालेल्या एका मुलाखतीत या निर्णयावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास शहा यांनी नकार दिला. 'मला याविषयी काहीही माहिती नाही आणि याबाबतीत म्हणण्यासारखं माझ्याकडे काहीही नाही. काश्मीर प्रश्नावरही मला काहीही म्हणायचं नाही' असं ते म्हणाले.