नवी दिल्ली: 'सध्या समाजात चोहोबाजूने विष पेरलं गेलं आहे. या परिस्थितीत लवकर सुधारणा होईल असं वाटत नाही. त्यामुळे मला माझ्या मुलांची चिंता सतावत आहे,' अशी भीती प्रसिद्ध अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी व्यक्त केली आहे. नसीरुद्दीन शहा यांनी त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. त्यात त्यांनी सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य केलंय. 'उद्या माझ्या मुलांना जमावाने घेरलं आणि त्यांना तू हिंदू की मुसलमान असं विचारलं तर त्यांच्याकडे त्याचं उत्तर नसेल, त्यामुळे मला माझ्या मुलांची चिंता वाटतेय. कारण मी माझ्या मुलांना कधीच धार्मिक शिक्षण दिलं नाही. चांगलं आणि वाईटाचा धर्माशी काहीच संबंध नसतो,' असं शहा यांनी म्हटलं आहे.
या व्हिडिओत त्यांनी बुलंदशहर हिंसेचा उल्लेखही केला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येपेक्षा गायीच्या मृत्यूला अधिक महत्त्व दिलं जात असल्याचं सांगतानाच जे लोक कायदा हातात घेत आहेत, त्यांना शिक्षा ठोठावलीच पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, शहा यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेने प्रतिक्रिया व्यक्त करताना नसीरुद्दीन शहा यांनी असं विधान करायला नको होतं, असं म्हटलं आहे.
या व्हिडिओत त्यांनी बुलंदशहर हिंसेचा उल्लेखही केला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येपेक्षा गायीच्या मृत्यूला अधिक महत्त्व दिलं जात असल्याचं सांगतानाच जे लोक कायदा हातात घेत आहेत, त्यांना शिक्षा ठोठावलीच पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, शहा यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेने प्रतिक्रिया व्यक्त करताना नसीरुद्दीन शहा यांनी असं विधान करायला नको होतं, असं म्हटलं आहे.