मुंबई:
पुलवामामध्ये भारतीय जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बॉलिवूडमधूनही नाराजीचा सूर उमटला. या हल्ल्याविरोधात भारतीय चित्रपट निर्माते एकवटले असून त्यांनी आपले चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं भारतीय चित्रपट निर्मात्यांचं काही प्रमाणात नुकसान होणार असलं तरी पाकिस्तानी सिनेउद्योगाला सुमारे १०० कोटींचा फटका बसणार आहे.
पाकिस्तानमध्ये बॉलिवूडच्या चित्रपटांना प्रचंड मागणी असते. तिथल्या चित्रपटसृष्टीच्या एकूण उलाढालीत ७०-८०% वाटा भारतीय चित्रपटांचा असतो. भारताच्या तुलनेत पाकमध्ये चित्रपटनिर्मिती कमी प्रमाणात होत असल्यानं थिएटर मालकांची ६०% कमाई भारतीय चित्रपटांवर अवलंबून असते. भारतीय चित्रपटांचं प्रदर्शन थांबल्यानं तेथील थिएटर मालकांची ही कमाई बंद होणार आहे. आर्थिक नुकसानीचा हा आकडा १०० कोटींपर्यंत असेल, असा अंदाज प्रसिद्ध फिल्म अँड ट्रेड बिझनेस अॅनालिस्ट गिरीश जोहर यांनी वर्तवलाय.
याशिवाय पाकिस्तानी गायकांना चित्रपटातून वगळल्यानं त्यांचंही नुकसान होणार आहे. भारतात या कलाकारांना बरंच काम आणि भरघोस मानधन मिळतं. पाकमधील म्युझिक इंडस्ट्री भारताएवढी विकसित नाही. त्यामुळं तेथील कलाकार भारतात येऊन प्रसिद्धी व पैसा मिळवतात. मात्र, आता त्यांचेही शो बंद होणार आहेत. त्यामुळं त्यांच्याही कमाईवरही गदा येणार आहे.
पुलवामामध्ये भारतीय जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बॉलिवूडमधूनही नाराजीचा सूर उमटला. या हल्ल्याविरोधात भारतीय चित्रपट निर्माते एकवटले असून त्यांनी आपले चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं भारतीय चित्रपट निर्मात्यांचं काही प्रमाणात नुकसान होणार असलं तरी पाकिस्तानी सिनेउद्योगाला सुमारे १०० कोटींचा फटका बसणार आहे.
पाकिस्तानमध्ये बॉलिवूडच्या चित्रपटांना प्रचंड मागणी असते. तिथल्या चित्रपटसृष्टीच्या एकूण उलाढालीत ७०-८०% वाटा भारतीय चित्रपटांचा असतो. भारताच्या तुलनेत पाकमध्ये चित्रपटनिर्मिती कमी प्रमाणात होत असल्यानं थिएटर मालकांची ६०% कमाई भारतीय चित्रपटांवर अवलंबून असते. भारतीय चित्रपटांचं प्रदर्शन थांबल्यानं तेथील थिएटर मालकांची ही कमाई बंद होणार आहे. आर्थिक नुकसानीचा हा आकडा १०० कोटींपर्यंत असेल, असा अंदाज प्रसिद्ध फिल्म अँड ट्रेड बिझनेस अॅनालिस्ट गिरीश जोहर यांनी वर्तवलाय.
याशिवाय पाकिस्तानी गायकांना चित्रपटातून वगळल्यानं त्यांचंही नुकसान होणार आहे. भारतात या कलाकारांना बरंच काम आणि भरघोस मानधन मिळतं. पाकमधील म्युझिक इंडस्ट्री भारताएवढी विकसित नाही. त्यामुळं तेथील कलाकार भारतात येऊन प्रसिद्धी व पैसा मिळवतात. मात्र, आता त्यांचेही शो बंद होणार आहेत. त्यामुळं त्यांच्याही कमाईवरही गदा येणार आहे.