विनय राऊळ
शूटिंगच्या निमित्तानं, ब्रेकमध्ये कलाकार खूप वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतात. अभिनेत्री प्रिया बापटनं मेघालय, हैदराबाद, कोची, हिमाचल, ताडोबा अशी काही ठिकाणं पालथी घातली. तिच्या या ब्रेकबद्दल…
प्रिया बापटनं 'मुन्नाभाई...'मधून हिंदीतही आपली छाप पाडली. सध्या आगामी 'आम्ही दोघी' या सिनेमाच्या शूटमध्ये ती व्यग्र आहे. हे शूटिंग सुरू होण्यापूर्वी घेतलेल्या ब्रेकमध्ये तिनं भारतातल्या अनेक ठिकाणी भटकंती केली. याविषयी तिनं ‘मुंटा’शी गप्पा मारल्या. मेघालय, पुडुचेरी, हैद्राबाद, कोची, हिमाचल प्रदेश, ताडोबा अभयारण्य अशा काही ठिकाणी ती फिरली.
मैत्रिणीसोबत मेघालयमध्ये गेली असताना ती काही स्थानिक लोकांसोबत राहिली होती. ज्या ठिकाणी त्या राहत होत्या तिथून बऱ्याच मोठ्या टापूत त्यांच्याशिवाय कुणीच नव्हतं. तिथे मोबाइल फोनला नेटवर्कही मिळत नव्हतं. तिथल्या पाच तंबूंपैकी एकामध्ये फक्त त्याच होत्या. त्यांचं हे राहण्याचं ठिकाण नदीच्या अगदी काठावर होतं. ‘नदीच्या पलीकडे बांगलादेशची सीमा होती. त्यामुळे मनात थोडी भीतीही होती. पण तिथल्या स्थानिकांची आम्हाला खूप मदत झाली. तिथली माणसं मनानं खूप चांगली आहेत. त्यांच्यावर आपण अगदी डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो. त्यांच्या वागण्यातल्या साधेपणातूनही ते कळून येतं. अतिशय जीव लावणारी आणि विश्वासाची अशी ही लोकं आहेत. तिथे भाषेचा मात्र प्रश्न येतो. स्थानिक लोक त्यांच्या भाषेत बोलतात. त्यामुळे तुम्हाला त्यांच्याशी बोलायचं असेल तर एक स्थानिक गाईडही लागतो. मेघालय भारतातलं सर्वात सुरक्षित असलेलं एक राज्य आहे.’ नवीन जागी फिरण्याची आवड असल्यानं पुढच्या काळात तिला स्पिती व्हॅली आणि इस्तंबूल, ग्रीस, स्पेन इथे फिरायला जायची इच्छा आहे.
दोघींचं गुपित
आगामी चित्रपटाच्या निमित्तानं प्रियानं तिच्या आणि मुक्ता बर्वेच्या मैत्रीचे काही धमाल किस्सेही सांगितले. प्रिया म्हणाली, की ‘सेटवर मुक्ता गमतीत लहान मुलासारखी सगळ्यांशी बोलायची. आम्ही एकमेकींशी बोलतानाही त्याच प्रकारे बोलायचो. मुक्तानं सर्वात आधी लहान मुलांच्या आवाजात, लाडीक स्वरात सगळ्यांना बोलावणं सुरू केलं. मग हळूहळू ते मीसुद्धा करायला लागले. त्यामुळे सेटवर कोणाला काही समजायचं नाही की या दोघींचं नेमकं काय सुरू आहे. कधी-कधी आम्ही एखाद्या गोष्टीवर खळखळून हसायचो. आता सध्या तरी सिनेमाचं कोल्हापूरमधलं शूट संपलंय. अजून शूट बाकी असल्यानं आणखीही धमाल करू.’
शूटिंगच्या निमित्तानं, ब्रेकमध्ये कलाकार खूप वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतात. अभिनेत्री प्रिया बापटनं मेघालय, हैदराबाद, कोची, हिमाचल, ताडोबा अशी काही ठिकाणं पालथी घातली. तिच्या या ब्रेकबद्दल…
प्रिया बापटनं 'मुन्नाभाई...'मधून हिंदीतही आपली छाप पाडली. सध्या आगामी 'आम्ही दोघी' या सिनेमाच्या शूटमध्ये ती व्यग्र आहे. हे शूटिंग सुरू होण्यापूर्वी घेतलेल्या ब्रेकमध्ये तिनं भारतातल्या अनेक ठिकाणी भटकंती केली. याविषयी तिनं ‘मुंटा’शी गप्पा मारल्या. मेघालय, पुडुचेरी, हैद्राबाद, कोची, हिमाचल प्रदेश, ताडोबा अभयारण्य अशा काही ठिकाणी ती फिरली.
मैत्रिणीसोबत मेघालयमध्ये गेली असताना ती काही स्थानिक लोकांसोबत राहिली होती. ज्या ठिकाणी त्या राहत होत्या तिथून बऱ्याच मोठ्या टापूत त्यांच्याशिवाय कुणीच नव्हतं. तिथे मोबाइल फोनला नेटवर्कही मिळत नव्हतं. तिथल्या पाच तंबूंपैकी एकामध्ये फक्त त्याच होत्या. त्यांचं हे राहण्याचं ठिकाण नदीच्या अगदी काठावर होतं. ‘नदीच्या पलीकडे बांगलादेशची सीमा होती. त्यामुळे मनात थोडी भीतीही होती. पण तिथल्या स्थानिकांची आम्हाला खूप मदत झाली. तिथली माणसं मनानं खूप चांगली आहेत. त्यांच्यावर आपण अगदी डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो. त्यांच्या वागण्यातल्या साधेपणातूनही ते कळून येतं. अतिशय जीव लावणारी आणि विश्वासाची अशी ही लोकं आहेत. तिथे भाषेचा मात्र प्रश्न येतो. स्थानिक लोक त्यांच्या भाषेत बोलतात. त्यामुळे तुम्हाला त्यांच्याशी बोलायचं असेल तर एक स्थानिक गाईडही लागतो. मेघालय भारतातलं सर्वात सुरक्षित असलेलं एक राज्य आहे.’ नवीन जागी फिरण्याची आवड असल्यानं पुढच्या काळात तिला स्पिती व्हॅली आणि इस्तंबूल, ग्रीस, स्पेन इथे फिरायला जायची इच्छा आहे.
दोघींचं गुपित
आगामी चित्रपटाच्या निमित्तानं प्रियानं तिच्या आणि मुक्ता बर्वेच्या मैत्रीचे काही धमाल किस्सेही सांगितले. प्रिया म्हणाली, की ‘सेटवर मुक्ता गमतीत लहान मुलासारखी सगळ्यांशी बोलायची. आम्ही एकमेकींशी बोलतानाही त्याच प्रकारे बोलायचो. मुक्तानं सर्वात आधी लहान मुलांच्या आवाजात, लाडीक स्वरात सगळ्यांना बोलावणं सुरू केलं. मग हळूहळू ते मीसुद्धा करायला लागले. त्यामुळे सेटवर कोणाला काही समजायचं नाही की या दोघींचं नेमकं काय सुरू आहे. कधी-कधी आम्ही एखाद्या गोष्टीवर खळखळून हसायचो. आता सध्या तरी सिनेमाचं कोल्हापूरमधलं शूट संपलंय. अजून शूट बाकी असल्यानं आणखीही धमाल करू.’