मुंबईः
'टाइम प्लीज' या चित्रपटांनतर तब्बल सात वर्षांनतर प्रिया बापट आणि उमेश कामत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'आणि काय हवं' या वेबसीरिजमध्ये ते दोघे झळकणार आहेत.
याआधी प्रिया आणि उमेशनं 'शुभः करोती', 'नवा गडी नवा राज्य' आणि 'टाइम प्लीज' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. प्रेक्षकांना प्रिया आणि उमेश यांची केमिस्ट्री पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. लग्नानंतर प्रत्येक जोडप्यांना पहिल्या गोष्टींचं अप्रूप असतं. लग्नानंतरचे छोटे छोटे सुखद क्षण जोडपे कसं जगतात यावर ही वेबसीरिज आधारित आहे. आम्ही बरेच वर्ष एकत्र काम केलं नव्हत. एकत्र काम करण्यासाठी आम्हाला एका चांगल्या स्क्रिप्टची गरज होती आणि या वेबसीरिजची कथा ऐकल्यानंतर आम्ही तात्काळ होकार कळवला. असं उमेश म्हणाला.
'आणि काय हवं' ही सहा भागांची वेबसीरिज आजपासून प्रदर्शित होत आहे. मुरांबा फेम वरूण नार्वेकर दिग्दर्शकाची जबाबदारी पार पाडत आहेत.
'टाइम प्लीज' या चित्रपटांनतर तब्बल सात वर्षांनतर प्रिया बापट आणि उमेश कामत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'आणि काय हवं' या वेबसीरिजमध्ये ते दोघे झळकणार आहेत.
याआधी प्रिया आणि उमेशनं 'शुभः करोती', 'नवा गडी नवा राज्य' आणि 'टाइम प्लीज' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. प्रेक्षकांना प्रिया आणि उमेश यांची केमिस्ट्री पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. लग्नानंतर प्रत्येक जोडप्यांना पहिल्या गोष्टींचं अप्रूप असतं. लग्नानंतरचे छोटे छोटे सुखद क्षण जोडपे कसं जगतात यावर ही वेबसीरिज आधारित आहे. आम्ही बरेच वर्ष एकत्र काम केलं नव्हत. एकत्र काम करण्यासाठी आम्हाला एका चांगल्या स्क्रिप्टची गरज होती आणि या वेबसीरिजची कथा ऐकल्यानंतर आम्ही तात्काळ होकार कळवला. असं उमेश म्हणाला.
'आणि काय हवं' ही सहा भागांची वेबसीरिज आजपासून प्रदर्शित होत आहे. मुरांबा फेम वरूण नार्वेकर दिग्दर्शकाची जबाबदारी पार पाडत आहेत.