अ‍ॅपशहर

४१ वर्षानंतर 'चरस' अडकला कायद्याच्या कचाट्यात

रामानंद सागर यांचा गाजलेला चित्रपट 'चरस' प्रदर्शित झाल्यानंतर तब्बल ४१ वर्षांनी कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. याचं कारण म्हणजे चित्रपटाच्या मुंबई वितरणाचे हक्क विकताना ठरवण्यात आलेल्या अनामत रकमेत तफावत असल्याचं समोर आलं आहे.

Maharashtra Times 28 Nov 2017, 4:18 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ramanand sagar dharmendra starrersuperhit film charas made in 1976 in i t trouble
४१ वर्षानंतर 'चरस' अडकला कायद्याच्या कचाट्यात


रामानंद सागर यांचा गाजलेला चित्रपट 'चरस' प्रदर्शित झाल्यानंतर तब्बल ४१ वर्षांनी कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे. याचं कारण म्हणजे चित्रपटाच्या मुंबई वितरणाचे हक्क विकताना ठरवण्यात आलेल्या अनामत रकमेत तफावत असल्याचं समोर आलं आहे.

मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी आणि पी.डी. नाइक यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाकडून रामानंद सागर यांच्या वारसदारांना सहा लाख रूपये दंड भरण्याचा आदेश देण्यात आलाय. हा सर्व प्रकार समोर आला जेव्हा सागर यांच्या कंपनीकडून आर्थिक वर्ष १९७६-७७साठी आयकर परतावा दाखल केला होता. आणि मुंबईत चित्रपटाच्या वितरणासाठी प्रकाश पिक्चर्सकडून मिळालेली रक्कम कमी दाखवण्यात आली होती.

सागर यांना प्रकाश पिक्चर्सतर्फे जी रक्कम देण्यात आली होती ती टॅक्स वाचवण्यासाठी दोन टप्प्यांत दाखवण्यात आली. पण प्रकाश पिक्चर्सनं त्याच वर्षी भरलेल्या
इनकम टॅक्स रिटर्नमध्ये हीच रक्कम एक रकमी दाखवली होती.

आयकर विभागाच्या मते सागर यांना १३.७ लाख रूपये प्रकाश पिक्चर्सकडून मिळाले होते. पण त्यांनी केवळ ३.९ लाख रूपयांचा खुलासा केला. त्यांनी पूर्ण रक्कम दाखवली असती तर त्यांना भरमसाठ कर भरावा लागला असता. तर सागर रामानंद यांच्या वकिलांच्या मते चित्रपटाची कमाई किती होईल याबद्दल शंका असल्यानं १३.७ लाख रूपये ही पूर्ण रक्कम कर भरताना दाखवण्यात आली नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज