विनय राऊळ, कॉलेज क्लब रिपोर्टर
वादग्रस्त ट्विट्समुळे रामगोपाल वर्मा नेहमी चर्चेत असतो. पण स्वतः रामूला त्यामुळे काही फरक पडत नाही. मी पूर्वी होतो तसाच आजही आहे. तुम्हाला जर माझे ट्विट्स आवडत नसतील तर खुशाल मला अनफॉलो करा, असं सांगून तो मोकळा होतो…
तुमच्या व्यक्त होण्याची सोशल मीडियावर खूप चर्चा होत असते…
माझं ट्विटर अकाऊंट म्हणजे माझा स्वतःचा दृष्टिकोन आहे असं मला वाटतं. त्यावरुन मी मला हवं तसं व्यक्त होत असतो. माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातले चित्रपट जर तुम्ही पाहिलेत तर तुम्हाला लक्षात येईल की मी कसा होतो. हैदराबादहून जेव्हा मी मुंबईत आलो तेव्हा मला कोणी ओळखत नव्हतं. त्यावेळी स्वतःला व्यक्त होण्यासाठी ट्विटर वगैरे काही आलं नव्हतं. पण तरीही मी आज जसा आहे तसाच पूर्वीही होतो. ट्विटर हे व्यक्त होण्याचं माध्यम आहे. कुणी कुणाला फॉलो करायचं, कुणाला नाही हे प्रत्येकाच्या आवडीनिवडीवर अवलंबून आहे. जर लोकांना माझे ट्विट्स आवडत नसतील तर त्यांनी खुशाल मला अनफॉलो करावं.
चित्रपटातल्या भूमिकांसाठी तुम्ही कलाकारांची निवड कशी करता?
चित्रपटाची कथा लिहितानाच मला हिरो-हिरोइन्सची नावं डोळ्यांसमोर येतात. तेव्हा जो हिरो किंवा हिरोइन माझ्या डोळ्यांसमोर येते ते माझ्या चित्रपटाचा भाग होतात. दुसरी गोष्ट अशी, की वास्तव जीवनात एखादी व्यक्ती कशी आहे हे ठाऊक असल्यानं भूमिकेसाठी आवश्यक वाटल्यास मी तिचा विचार करतो.
जे सिनेमे, कलाकार, तंत्रज्ञ राष्ट्रीय पुरस्कार विजेते ठरले त्यांच्याबद्दल काय सांगाल ?
पहिली गोष्ट म्हणजे ज्या चित्रपटांना पुरस्कार मिळाले आहेत ते मी अजून पाहिलेले नाहीत. अभिनयाबद्दलचे माझे विचार आणि माझा दृष्टिकोन हा खूप वेगळा आहे. माझ्या मते एका अभिनेत्याला एका भूमिकेवरुन पारखणं हीच मुळात चुकीची गोष्ट आहे. कारण एक अभिनेता खूप वेगवेगळ्या भूमिका करतो आणि प्रत्येक भूमिका ही त्या-त्या चित्रपटाच्या कथेवर अवलंबून असते.
‘सरकार’पासून ते ‘सरकार ३’पर्यंत तुमच्या सर्व चित्रपटांचं खूप कौतुक झालं. ही संपूर्ण कल्पना तुमच्या डोक्यात कशी आली?
ही कल्पना डोक्यात यायचं मुख्य कारण म्हणजे 'गॉडफादर' हे पुस्तक आणि ऐंशीच्या दशकातलं अमिताभ बच्चन यांचं चित्रपटातलं काम. ते पाहून मी खूप प्रभावित झालो. जे लोक चांगलं काम करतात ते मला आकर्षित करतात.
वादग्रस्त ट्विट्समुळे रामगोपाल वर्मा नेहमी चर्चेत असतो. पण स्वतः रामूला त्यामुळे काही फरक पडत नाही. मी पूर्वी होतो तसाच आजही आहे. तुम्हाला जर माझे ट्विट्स आवडत नसतील तर खुशाल मला अनफॉलो करा, असं सांगून तो मोकळा होतो…
तुमच्या व्यक्त होण्याची सोशल मीडियावर खूप चर्चा होत असते…
माझं ट्विटर अकाऊंट म्हणजे माझा स्वतःचा दृष्टिकोन आहे असं मला वाटतं. त्यावरुन मी मला हवं तसं व्यक्त होत असतो. माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातले चित्रपट जर तुम्ही पाहिलेत तर तुम्हाला लक्षात येईल की मी कसा होतो. हैदराबादहून जेव्हा मी मुंबईत आलो तेव्हा मला कोणी ओळखत नव्हतं. त्यावेळी स्वतःला व्यक्त होण्यासाठी ट्विटर वगैरे काही आलं नव्हतं. पण तरीही मी आज जसा आहे तसाच पूर्वीही होतो. ट्विटर हे व्यक्त होण्याचं माध्यम आहे. कुणी कुणाला फॉलो करायचं, कुणाला नाही हे प्रत्येकाच्या आवडीनिवडीवर अवलंबून आहे. जर लोकांना माझे ट्विट्स आवडत नसतील तर त्यांनी खुशाल मला अनफॉलो करावं.
चित्रपटातल्या भूमिकांसाठी तुम्ही कलाकारांची निवड कशी करता?
चित्रपटाची कथा लिहितानाच मला हिरो-हिरोइन्सची नावं डोळ्यांसमोर येतात. तेव्हा जो हिरो किंवा हिरोइन माझ्या डोळ्यांसमोर येते ते माझ्या चित्रपटाचा भाग होतात. दुसरी गोष्ट अशी, की वास्तव जीवनात एखादी व्यक्ती कशी आहे हे ठाऊक असल्यानं भूमिकेसाठी आवश्यक वाटल्यास मी तिचा विचार करतो.
जे सिनेमे, कलाकार, तंत्रज्ञ राष्ट्रीय पुरस्कार विजेते ठरले त्यांच्याबद्दल काय सांगाल ?
पहिली गोष्ट म्हणजे ज्या चित्रपटांना पुरस्कार मिळाले आहेत ते मी अजून पाहिलेले नाहीत. अभिनयाबद्दलचे माझे विचार आणि माझा दृष्टिकोन हा खूप वेगळा आहे. माझ्या मते एका अभिनेत्याला एका भूमिकेवरुन पारखणं हीच मुळात चुकीची गोष्ट आहे. कारण एक अभिनेता खूप वेगवेगळ्या भूमिका करतो आणि प्रत्येक भूमिका ही त्या-त्या चित्रपटाच्या कथेवर अवलंबून असते.
‘सरकार’पासून ते ‘सरकार ३’पर्यंत तुमच्या सर्व चित्रपटांचं खूप कौतुक झालं. ही संपूर्ण कल्पना तुमच्या डोक्यात कशी आली?
ही कल्पना डोक्यात यायचं मुख्य कारण म्हणजे 'गॉडफादर' हे पुस्तक आणि ऐंशीच्या दशकातलं अमिताभ बच्चन यांचं चित्रपटातलं काम. ते पाहून मी खूप प्रभावित झालो. जे लोक चांगलं काम करतात ते मला आकर्षित करतात.