मुंबई:
राष्ट्रीय पुरस्कार विजेती आणि 'दंगल'फेम अभिनेत्री झायरा वसीमने अचानक बॉलिवूडला अलविदा करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तिचा हा निर्णय अनेकांच्या पचनी पडलेला नाही. झायरानं घेतलेल्या या निर्णयामुळे अभिनेत्री रवीना टंडननं तिला खडे बोल सुनावले आहेत.
झायराने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करून बॉलिवूडला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा रविवारी केली. रविनानेही ट्विट करत तिला याविषयी सुनावले आहे. 'ज्या इंडस्ट्रीनं तुम्हाला सगळं काही दिलं ती इंडस्ट्री अशा एखाद-दुसरा चित्रपट केलेल्यांना सोडायची असल्यास त्यांनी ती खुशाल सोडावी. परंतु, इंडस्ट्री सोडताना तिचा मान ठेवत अदबीनं बाहेर पडावं...शिवाय, स्वत:चे विचारही स्वत:कडेच ठेवावेत'असं रविना म्हणाली. तिनं पुढं लिहिलंय की, 'चित्रपटसृष्टीवर माझं प्रचंड प्रेम आहे आणि इंडस्ट्रीची बाजू घेऊन मी नेहमीच भूमिका घेत राहीन. इंडस्ट्री सोडणं हा तुझा एकटीचा निर्णय आहे. त्यासाठी तुझी कारणंही असतील. परंतु, तुझ्या निर्णयासाठी संपूर्ण इंडस्ट्रीचं नाव बदनाम करू नकोस. इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक माणूस एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करत करतो, इथं कोणीच जात, धर्म, तुम्ही कुठून आला आहात या गोष्टींचा विचारसुद्धा करत नाही. इंडस्ट्रीचा मान ठेव' असं म्हणत तिनं झायराची कानउघडणी केली.
दरम्यान, झायरानं इस्लामच्या मार्गावरून चालण्यास एकदा नव्हे; शंभरदा अपयशी ठरल्याची भावना पक्की झाल्यानेच बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला असं म्हटलं आहे. सिनेमात काम करणे हे 'इमान'च्या विरोधात असल्याचेही तिने म्हटले आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेती आणि 'दंगल'फेम अभिनेत्री झायरा वसीमने अचानक बॉलिवूडला अलविदा करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तिचा हा निर्णय अनेकांच्या पचनी पडलेला नाही. झायरानं घेतलेल्या या निर्णयामुळे अभिनेत्री रवीना टंडननं तिला खडे बोल सुनावले आहेत.
झायराने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करून बॉलिवूडला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा रविवारी केली. रविनानेही ट्विट करत तिला याविषयी सुनावले आहे. 'ज्या इंडस्ट्रीनं तुम्हाला सगळं काही दिलं ती इंडस्ट्री अशा एखाद-दुसरा चित्रपट केलेल्यांना सोडायची असल्यास त्यांनी ती खुशाल सोडावी. परंतु, इंडस्ट्री सोडताना तिचा मान ठेवत अदबीनं बाहेर पडावं...शिवाय, स्वत:चे विचारही स्वत:कडेच ठेवावेत'असं रविना म्हणाली. तिनं पुढं लिहिलंय की, 'चित्रपटसृष्टीवर माझं प्रचंड प्रेम आहे आणि इंडस्ट्रीची बाजू घेऊन मी नेहमीच भूमिका घेत राहीन. इंडस्ट्री सोडणं हा तुझा एकटीचा निर्णय आहे. त्यासाठी तुझी कारणंही असतील. परंतु, तुझ्या निर्णयासाठी संपूर्ण इंडस्ट्रीचं नाव बदनाम करू नकोस. इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक माणूस एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करत करतो, इथं कोणीच जात, धर्म, तुम्ही कुठून आला आहात या गोष्टींचा विचारसुद्धा करत नाही. इंडस्ट्रीचा मान ठेव' असं म्हणत तिनं झायराची कानउघडणी केली.
दरम्यान, झायरानं इस्लामच्या मार्गावरून चालण्यास एकदा नव्हे; शंभरदा अपयशी ठरल्याची भावना पक्की झाल्यानेच बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला असं म्हटलं आहे. सिनेमात काम करणे हे 'इमान'च्या विरोधात असल्याचेही तिने म्हटले आहे.