मुंबई
दिग्दर्शक शशांक खेतान यांचा धडक हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास घडवत आहे. मराठी चित्रपट सैराटचा हिंदी रिकेम असलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर ५० कोटींचा गल्ला जमवला आहे. याबरोबर या चित्रपटाद्वारे पदार्पण केलेली जान्हवी कपूर आणि ईशानची प्रशंसाही होत आहे. या चित्रपटात दोघांची उत्तम केमिस्ट्री जुळलेली पाहायला मिळत आहे. फिल्मफेअर मॅगझीनच्या लेटेस्ट कव्हरवरही दोघे खुलून दिसत आहेत.
धडक चित्रपटातील अभिनयाबाबत सकारात्मक आणि नकारात्मक परिक्षणे वाचून तुला कसे वाटले, असा प्रश्न जान्हवी कपूरला पत्रकार परिषदेत विचारला गेला. त्यावर ती म्हणाली, 'जेव्हा माझी प्रशंसा झाली तेव्हा मी तर आनंदाने उड्याच मारायला लागले, मात्र जेव्हा मी नकारात्मक परिक्षणे वाचली तेव्हा मी बाथरुपमध्ये जाऊन खूप रडले. दर्शकांची नाळ सैराट चित्रपटाशी खूपच जुळलेली आहे, मात्र त्यांनी धडकला देखील एक संधी दिली पाहिजे.'
जान्हवीच्या आयुष्यात या चित्रपटाने मोठे स्थान प्राप्त केले आहे. ती म्हणते की, 'माझी आई आणि प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री श्रीदेवी हिच्या जाण्यानंतर धडक चित्रपटामुळे मला सावरण्याची मोठी मदत मिळाली. या चित्रपटामुळेच मी माझ्या आईच्या जाण्याचे दु:ख सहन करू शकले.
दिग्दर्शक शशांक खेतान यांचा धडक हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवा इतिहास घडवत आहे. मराठी चित्रपट सैराटचा हिंदी रिकेम असलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर ५० कोटींचा गल्ला जमवला आहे. याबरोबर या चित्रपटाद्वारे पदार्पण केलेली जान्हवी कपूर आणि ईशानची प्रशंसाही होत आहे. या चित्रपटात दोघांची उत्तम केमिस्ट्री जुळलेली पाहायला मिळत आहे. फिल्मफेअर मॅगझीनच्या लेटेस्ट कव्हरवरही दोघे खुलून दिसत आहेत.
धडक चित्रपटातील अभिनयाबाबत सकारात्मक आणि नकारात्मक परिक्षणे वाचून तुला कसे वाटले, असा प्रश्न जान्हवी कपूरला पत्रकार परिषदेत विचारला गेला. त्यावर ती म्हणाली, 'जेव्हा माझी प्रशंसा झाली तेव्हा मी तर आनंदाने उड्याच मारायला लागले, मात्र जेव्हा मी नकारात्मक परिक्षणे वाचली तेव्हा मी बाथरुपमध्ये जाऊन खूप रडले. दर्शकांची नाळ सैराट चित्रपटाशी खूपच जुळलेली आहे, मात्र त्यांनी धडकला देखील एक संधी दिली पाहिजे.'
जान्हवीच्या आयुष्यात या चित्रपटाने मोठे स्थान प्राप्त केले आहे. ती म्हणते की, 'माझी आई आणि प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री श्रीदेवी हिच्या जाण्यानंतर धडक चित्रपटामुळे मला सावरण्याची मोठी मदत मिळाली. या चित्रपटामुळेच मी माझ्या आईच्या जाण्याचे दु:ख सहन करू शकले.