अ‍ॅपशहर

ऋषी कपूर यांनी डागली संगीत कपन्यांवर तोफ

सोशल मीडियाच्या माध्यमातून बिनाधस्त व बेधडक वक्तव्य करणारे अभिनेते ऋषी कपूर यांनी आता संगीत कंपन्यांना लक्ष्य केलं आहे. 'संगीत कंपन्या कलाकारांचं शोषण करतात. अनेक लोक त्यांच्या गुंडगिरीला वैतागले आहेत,' असा आरोप त्यांनी केला आहे.

Maharashtra Times 11 Sep 2017, 4:53 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rishi kapoor reacted on music companies monopoly
ऋषी कपूर यांनी डागली संगीत कपन्यांवर तोफ


सोशल मीडियाच्या माध्यमातून बिनाधस्त व बेधडक वक्तव्य करणारे अभिनेते ऋषी कपूर यांनी आता संगीत कंपन्यांना लक्ष्य केलं आहे. 'संगीत कंपन्या कलाकारांचं शोषण करतात. अनेक लोक त्यांच्या गुंडगिरीला वैतागले आहेत,' असा आरोप त्यांनी केला आहे.

'पटेल की पंजाबी शादी' या आगामी सिनेमाच्या प्रसिद्धीच्या कार्यक्रमादरम्यान दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. 'सध्या गाणी ऐकली जात नाहीत. पाहिली जातात. आमच्या काळात आम्ही गाणी बनवून ती प्रेक्षकांना ऐकवायचो. आज संगीत कपन्यांकडं चांगलं गाणं घेऊन गेलं की ते म्हणतात या गाण्यांची रिंगटोन बनू शकत नाही. म्हणजे मोबाइलची रिंगटोन केंद्रस्थानी ठेवून गाणी बनवायची? असं झालं तर कशी चांगली गाणी बनणार,' असा सवाल त्यांनी केला. 'चांगलं काम नसल्यामुळं अनेक संगीत दिग्दर्शक आणि गीतकार यांना त्रास सहन करावा लागत आहे. आम्हाला जे करायचं आहे, ते करायला मिळत नाही. प्रेक्षक मात्र आम्हालाच दोष देतात, अशी अनेकांची तक्रार असल्याचं ऋषी कपूर म्हणाले.

'काही संगीत कंपन्या तर गायक व संगीतकारांकडून करार करून घेतात. या करारामुळं गायकांना स्वंतत्रपणे काम करता येत नाही. त्यांना फक्त शो करण्याचेच पैसे दिले जातात. जे गायक संगीत कपन्यांचं ऐकत नाहीत त्यांना नंतर कुठंच काम मिळत नाही. एखाद्या गायकाचं पहिलं गाणं गाण्यास संगीत कपन्यांच्या गायकानं गाण्यास नकार दिला तर ते गाणं कंपन्या दुसऱ्या गायकाकडून डब करून घेतात,' असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज